विलीनीकरणाच्या चर्चेला विरोध नव्हता- तटकरे 
महाराष्ट्र

विलीनीकरणाच्या चर्चेला विरोध नव्हता- तटकरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबतची चर्चा सुरू होती, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

Swapnil S

मुंबईः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबतची चर्चा सुरू होती, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, काही आठवड्यांपूर्वी शरद पवार गटाने असाच दावा केला असता तटकरे यांनी तो फेटाळून लावला होता; मात्र आता त्यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या विलीनीकरणाच्या चर्चेला आपला विरोध नव्हता असेही तटकरे यांनी म्हटले आहे. मात्र विलीनीकरण कोणाचे कोणात होणार हा प्रश्न होता. तसेच विलीनीकरण झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’सोबतच राहील अशी आपली भूमिका होती असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष शोकसागरात असताना ही चर्चा सार्वजनिक केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, विलीनीकरणाबाबत पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य राहील असे महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले.

Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजाराने स्थायी समिती तापली; अपुरे मनुष्यबळ, फॉगिंग मशीनमुळे सदस्य संतप्त

­शिक्षणानंतरही नोकरीची शाश्वती नाही; पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली खंत

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा