महाराष्ट्र

नोकरीच्या शोधातून थेट कर्जाच्या खाईत; सुष्को ईव्ही स्कूटर घोटाळ्यात तरुणांची ससेहोलपट

राज्यात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या हजारो तरुणांना 'सुष्को' नावाच्या कंपनीने ईव्ही स्कूटरच्या मार्केटिंगचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात तरुणांकडून कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर कर्ज काढण्यात आले असून, अनेक मोठे फायनान्स कंपन्या आणि बँकांचे कर्मचारीही यात सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Swapnil S

पुणे : राज्यात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या हजारो तरुणांना 'सुष्को' नावाच्या कंपनीने ईव्ही स्कूटरच्या मार्केटिंगचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात तरुणांकडून कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर कर्ज काढण्यात आले असून, अनेक मोठे फायनान्स कंपन्या आणि बँकांचे कर्मचारीही यात सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

फसवणूक झालेल्या तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सुष्को' कंपनी सोशल मीडियावर 'घरबसल्या काम करा, दररोज ५ ते १५ हजार कमवा' अशा आकर्षक नोकरीच्या जाहिराती देत होती. रोजगार शोधणारे तरुण या जाहिरातींना बळी पडत होते. कंपनी पुण्यातील मुख्य शाखेतून ईव्ही स्कूटर मार्केटिंगची नोकरी देऊ करत होती. मार्केटिंगसाठी स्कूटर दिली जाईल, असे सांगून तरुणांकडून त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर महत्त्वाची कागदपत्रे घेतली जात होती. यानंतर, तरुणांना कोणतीही कल्पना नसताना, त्यांच्या नावावर एचडीएफसी बँक, फायनान्स आणि कॅशिफाय यासारख्या कंपन्यांकडून स्कूटर खरेदीसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले जात होते. सुरुवातीला काही महिने कंपन्यांनी या कर्जाचे हप्ते भरले, मात्र नंतर ते बंद केले. कंपनीने हप्ते भरणे बंद केल्यावर,पीडित तरुणांना बँकांकडून कर्ज थकल्याचे आणि ईएमआय बाऊन्स झाल्याचे मेसेज येऊ लागले. यानंतर तरुणांनी आपला सिबिल स्कोअर तपासला असता, तो मोठ्या प्रमाणावर घसरलेला आढळला. यामुळे त्यांना शिक्षण कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज मिळणे भविष्यात अत्यंत कठीण झाले आहे.

फसवणुकीचा आकडा कोट्यवधींच्या घरात

या फसवणूकप्रकरणी सुरुवातीला स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये ५ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद केले असले, तरी पीडितांच्या मते हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

मोनेडो फायनान्सकडून मिळालेल्या यादीनुसार, केवळ त्यांच्या माध्यमातून १२०६ लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मुंबई, अक्कलकोट, पाटणा येथूनही अनेक तरुण या फसवणुकीचे बळी ठरले आहेत.

OTP द्या, पाणी घ्या! टँकर बुकिंगसाठी BMC ची नवी डिजिटल प्रणाली अंतिम टप्प्यात; अनधिकृत पाणीउपसाला बसणार लगाम

ओमानजवळ व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नौदलाला इमर्जन्सी कॉल अन् MRCC च्या तत्परतेमुळे २४ भारतीय खलाशांची सुटका

Mumbai : दुसरी लाईफलाइन ठरतेय ‘काळ’...वर्षभरात ‘बेस्ट’च्या धडकेत ३२ जणांचा मृत्यू

साखरपुड्याच्या आनंदावर विरजण! जळगावात कार-एसटी-दुचाकीचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा अंत, दुचाकीस्वारही ठार

मे महिन्यात ईव्ही विक्रीचा नवा विक्रम; देशात विजेवरील वाहनांच्या लोकप्रियतेत वाढ