महाराष्ट्र

अखेर शेतकरी लॉन्ग मोर्चा मागे ; सरकारशी झाली सकारात्मक चर्चा

नवशक्ती Web Desk

अखेर पाच दिवसांच्या अथक आंदोलनानंतर शेतकरी लाँग मार्च परतणार आहे. माजी आमदार जे.पी.गावित, जिल्हाप्रमुख, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले असून सरकारने मागण्या मान्य केल्याने लाल वादळ शमले आहे. आता हे सर्व शेतकरी रेल्वेने घरी परतणार असल्याचे समजते.
माजी आमदार जे.पी.गावित व संबंधित अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर जे.पी.गावित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गावित म्हणाले, राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या असून आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत. मागण्या मान्य झाल्याच्या सरकारी घोषणेची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला दिली. त्यामुळे आम्ही लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत गावित यांनी पोलीस, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले.
आज सकाळपासून हे आंदोलन (शेतकरी आंदोलन) स्थगित होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्यतेची प्रत जे.पी.गावित यांना दिल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. गावित म्हणाले, "आम्ही सतरा मागण्या केल्या होत्या, त्यातील काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. काही मागण्यांची अंमलबजावणी महिनाभरात केली जाईल. काही मागण्या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवल्या जातील. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आमच्या ७० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना घरी पोहोचवण्यासाठी सरकारने बुक केलेली ट्रेन
शेतकऱ्यांना घरी सोडण्यासाठी सरकारकडून ट्रेनही बुक करण्यात आली आहे. दोन दिवस वाशिंदमध्ये राहिल्यानंतर ते आज आपल्या घरी परतणार आहेत.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर