महाराष्ट्र

औरंगाबादचे नामांतर हा विषय आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही ; राजेश टोपे

प्रतिनिधी

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर म्हटल्याने औरगांबादच्या नामांतराचा वाद पुन्हा सुरु झाला आहे. आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचे नामांतर हा आमच्या सरकारच्या अजेंड्याचा विषय नाही असे म्हटल्याने पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद येथे माध्यमांनी सध्या सुरू असलेल्या औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या वादावार प्रश्न विचारला असता राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘हा विषय आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही,’

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

राज्यात दोन दिवस वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाने वर्तविला अंदाज

...आणि आता तेलही! युद्धामुळे भारतातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम

मुंबईची तुंबई होणार; मिठी नदीच्या सफाईसाठी कंत्राटदारच नाही, स्थायी समितीत सदस्य आक्रमक

LPG ची टंचाई कायमच; केंद्र सरकारची कबुली, PNG स्वीकारण्याचाही सल्ला