महाराष्ट्र

धुवाधार पावसात आठ प्रवाशांसह स्कॉर्पिओ गेली वाहून

तिघांचे मृतदेह सापडले असून बुडालेल्या इतर प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

वृत्तसंस्था

नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील केळवद येथील बामनमारी येथे धुवाधार पावसात एक स्कॉर्पिओ वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. वाहून गेलेल्या स्कॉर्पिओमध्ये आठ प्रवासी होते. त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून बुडालेल्या इतर प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. सापडलेल्या मृतदेहांमध्ये एक महिला, एक पुरूष व एका लहान मुलाचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून याच पावसामुळे बामनमारी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात गाडी चालकाने पुलावरून पाणी वाहत असतानादेखील गाडी घालण्याचे धाडस दाखवले. त्याचवेळी पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने गाडी नदीत वाहून गेल्याचे सांगितले जाते.

Union Budget 2026 : मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट; नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून; अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

भारताच्या 'ऑरेंज इकॉनॉमी'ला मिळाला IIT चा दर्जा! बजेट २०२६ मध्ये क्रिएटर इकॉनॉमीसाठी मोठी घोषणा

Thane : महापालिकेत नवीन समीकरणांची नांदी; स्थायी समिती व स्वीकृत पदांसाठी शिंदेसेना-भाजपमध्ये लॉबिंग

रायबाकिनाला जेतेपद; आर्यना सबालेंकाचा झंझावात रोखला; ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणारी कझाकस्तानची पहिली टेनिसपटू

Nirmala Sitharaman : यंदाची 'बजेट डे साडी' आहे खास! काय आहेत वैशिष्ट्य? याआधीही नेसल्या होत्या युनिक साड्या; पाहा Photo's