महाराष्ट्र

धुवाधार पावसात आठ प्रवाशांसह स्कॉर्पिओ गेली वाहून

तिघांचे मृतदेह सापडले असून बुडालेल्या इतर प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

वृत्तसंस्था

नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील केळवद येथील बामनमारी येथे धुवाधार पावसात एक स्कॉर्पिओ वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. वाहून गेलेल्या स्कॉर्पिओमध्ये आठ प्रवासी होते. त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून बुडालेल्या इतर प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. सापडलेल्या मृतदेहांमध्ये एक महिला, एक पुरूष व एका लहान मुलाचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून याच पावसामुळे बामनमारी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात गाडी चालकाने पुलावरून पाणी वाहत असतानादेखील गाडी घालण्याचे धाडस दाखवले. त्याचवेळी पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने गाडी नदीत वाहून गेल्याचे सांगितले जाते.

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मध्य प्रदेशात परीक्षेदरम्यान आयएएस अधिकाऱ्याची विद्यार्थ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकातील गोकर्ण गुहेतून रशियन महिलेची सुटका

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद