महाराष्ट्र

धुवाधार पावसात आठ प्रवाशांसह स्कॉर्पिओ गेली वाहून

वृत्तसंस्था

नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील केळवद येथील बामनमारी येथे धुवाधार पावसात एक स्कॉर्पिओ वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. वाहून गेलेल्या स्कॉर्पिओमध्ये आठ प्रवासी होते. त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून बुडालेल्या इतर प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. सापडलेल्या मृतदेहांमध्ये एक महिला, एक पुरूष व एका लहान मुलाचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून याच पावसामुळे बामनमारी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात गाडी चालकाने पुलावरून पाणी वाहत असतानादेखील गाडी घालण्याचे धाडस दाखवले. त्याचवेळी पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने गाडी नदीत वाहून गेल्याचे सांगितले जाते.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग