महाराष्ट्र

शालेय गृहपाठाबद्दल केसरकरांनी व्यक्त केले 'हे' मत

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना खेळण्यासाठी अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने हा निर्णय

वृत्तसंस्था

राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार इयत्ता 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार करत आहे. लवकरच तज्ञांशी चर्चा करून गृहपाठ बंदीचा निर्णय घेणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुलांवर अभ्यासाचे ओझे असू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. तसेच, गृहपाठ शिक्षकांसाठी पळवाटा असू नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लवकर समजेल अशा पद्धतीने शिकवावे, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही. पण हा एक मोठा निर्णय आहे आणि हे माझे वैयक्तिक मत आहे. याबाबत शिक्षक संघटना, संस्था व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे निर्णय राज्य सरकारने घेतल्यास विद्यार्थ्यांवर पुन्हा घरी येऊन अभ्यास करण्याचा ताण कमी होईल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना खेळण्यासाठी अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. आगामी शैक्षणिक वर्षात हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयानुसार मुलांवरील दप्तराचे ओझे कमी होणार आहे

मुंबईकरांना पाणी दिलासा; पाणीपट्टीत वाढ न करण्याचे BMC चे आश्वासन

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : पोलीस, पालिकेचे अधिकारी दोषी

Mumbai : समुद्राचे पाणी दूषित; तातडीने उपाययोजना करण्याची नगरसेवकांची मागणी

जप्त मालमत्ता निकाली काढण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

सोशल मीडिया धोरण लवकरच; अल्पवयीन मुलांच्या वापरावर आणणार नियंत्रण; माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांची माहिती