महाराष्ट्र

शालेय गृहपाठाबद्दल केसरकरांनी व्यक्त केले 'हे' मत

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना खेळण्यासाठी अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने हा निर्णय

वृत्तसंस्था

राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार इयत्ता 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार करत आहे. लवकरच तज्ञांशी चर्चा करून गृहपाठ बंदीचा निर्णय घेणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुलांवर अभ्यासाचे ओझे असू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. तसेच, गृहपाठ शिक्षकांसाठी पळवाटा असू नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लवकर समजेल अशा पद्धतीने शिकवावे, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही. पण हा एक मोठा निर्णय आहे आणि हे माझे वैयक्तिक मत आहे. याबाबत शिक्षक संघटना, संस्था व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे निर्णय राज्य सरकारने घेतल्यास विद्यार्थ्यांवर पुन्हा घरी येऊन अभ्यास करण्याचा ताण कमी होईल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना खेळण्यासाठी अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. आगामी शैक्षणिक वर्षात हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयानुसार मुलांवरील दप्तराचे ओझे कमी होणार आहे

नवीन GST सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा; आजपासून अन्न, गृहनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, वाहने, शेती, आरोग्यसेवा स्वस्त

आजपासून GST बचत उत्सव! पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा : स्वदेशी, स्वावलंबनावर भर; जनतेची २.५ लाख कोटींपेक्षा जास्त बचत होणार

मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

राज्यात नवरात्रोत्सवाची धूम; ठाण्यात बाजारपेठांमध्ये गर्दी

भिवंडीत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई