महाराष्ट्र

राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता

प्रतिनिधी

राज्यात पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. तीन दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक, नंदूरबार, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरू असून पुणे, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातही पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दोन दिवसांपासून मुंबईसह पुणे, रायगड, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, वर्धा आणि बुलढाणा या जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?