महाराष्ट्र

"अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे करुन तातडीने मदत देणार", राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले 'हे' आठ महत्वाचे निर्णय

राज्यात अवकाळीने थैमान घातलेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेलंगणात प्रचारासाठी गेल्याने ते टीकेचे धनी झाले होते.

नवशक्ती Web Desk

गेल्या ३-४ दिवसात राज्यातील अनेक जिल्हात अवकाळी पाऊस झाला. यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला गेला. अनेक ठिकाणी पावसासोबत वादळी वारा तसंच गारपीट देखील झाली. यावर राज्य सरकारने तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल गेलेले निर्णय

  • अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार

  • झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात

  • राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान. शाळांचं मुल्यांकन करणार

  • पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा आणि मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार

  • मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ शासन हमी वाढवण्यात आलेली आहे

  • औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन

  • 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना -२०२३' राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार

  • शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

असे अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. राज्यात अवकाळीने थैमान घातलेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेलंगणात प्रचारासाठी गेले असल्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली होती. तसंच इतर विरोधी पक्षांकडून देखील मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं गेलं होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक