File Photo 
महाराष्ट्र

हा थोड्या दिवसाचा खेळ आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच - आदित्य ठाकरे

महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्याचवेळी अजित पवार

नवशक्ती Web Desk

आज मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' बैठक होत आहे. या बैठकीत ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काय बोलणार? याकडे साऱ्यांचं लक्ष होते. दरम्यान, ठाकरे गटनेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर चांगलीच टीका केली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

हे सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी आज पुन्हा एकदा आपल्या भाषणामधून केले. महाराष्ट्राला यातून बाहेर काढायचे आहे. महाराष्ट्राला सुवर्णयुगात घेऊन जायचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्याचवेळी अजित पवार, बाळासाहेब थोरात यांसारखे नेते आम्ही सर्वजण एक मजबूत टीम म्हणून काम करत होतो. आपण मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात आणू शकलो. ही आपल्या महाविकास आघाडीची ताकद होती. त्या अडीच वर्षांत राज्यात कुठेही दंगल झाली नाही, कुठेही भेदभाव झाला नाही. प्रत्येक आमदार आपल्या विधानसभेत शेतकरी, तरुण आणि महिलांची काळजी घेऊन काम करत होता. आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घटनाबाह्य सरकार बसले आहे. मी लिहून देतो की हा थोड्य दिवसाचा खेळ आहे. हे सरकार कोसळणारच ..."

Thane : सर्व्हिस सेंटरमध्ये १० जूनपर्यंत वाहने धुण्यावर निर्बंध; पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधींसाठी पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपनीची चौकशी करण्याचे निर्देश

अयान अहमद आईचे दागिने विकून करायचा शौक; अमरावती लैंगिक शोषणप्रकरणी धक्कादायक खुलासा

तमिळनाडूमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या; ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य EVMमध्ये बंद होणार, ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल

जाॅन टर्नसच्या हाती ॲपल! टीम कूक लवकरच सोडणार कंपनीचे मुख्याधिकारीपद