File Photo
File Photo 
महाराष्ट्र

हा थोड्या दिवसाचा खेळ आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच - आदित्य ठाकरे

नवशक्ती Web Desk

आज मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' बैठक होत आहे. या बैठकीत ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काय बोलणार? याकडे साऱ्यांचं लक्ष होते. दरम्यान, ठाकरे गटनेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर चांगलीच टीका केली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

हे सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी आज पुन्हा एकदा आपल्या भाषणामधून केले. महाराष्ट्राला यातून बाहेर काढायचे आहे. महाराष्ट्राला सुवर्णयुगात घेऊन जायचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्याचवेळी अजित पवार, बाळासाहेब थोरात यांसारखे नेते आम्ही सर्वजण एक मजबूत टीम म्हणून काम करत होतो. आपण मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात आणू शकलो. ही आपल्या महाविकास आघाडीची ताकद होती. त्या अडीच वर्षांत राज्यात कुठेही दंगल झाली नाही, कुठेही भेदभाव झाला नाही. प्रत्येक आमदार आपल्या विधानसभेत शेतकरी, तरुण आणि महिलांची काळजी घेऊन काम करत होता. आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घटनाबाह्य सरकार बसले आहे. मी लिहून देतो की हा थोड्य दिवसाचा खेळ आहे. हे सरकार कोसळणारच ..."

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग