महाराष्ट्र

रत्नागिरीत तीन समुद्री घोड्यांची सुटका; मासेमारीच्या जाळ्यात होते अडकले

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खाडीमध्ये मासेमारीच्या बेवारस जाळ्यांत अडकलेल्या तीन समुद्री घोड्यांची (सी-हॉर्स) सुटका करून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि राज्य वनविभागाच्या पथकाने ही कामगिरी केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खाडीमध्ये मासेमारीच्या बेवारस जाळ्यांत अडकलेल्या तीन समुद्री घोड्यांची (सी-हॉर्स) सुटका करून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि राज्य वनविभागाच्या पथकाने ही कामगिरी केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हे समुद्री घोडे मिऱ्या, काळबादेवी आणि शिरगाव खाडीमध्ये मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या आणि नंतर तिथेच टाकून दिलेल्या जाळ्यांमध्ये (ज्यांना 'घोस्ट फिशिंग गिअर' म्हटले जाते) अडकले होते. समुद्री घोडे हे वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची-१ मध्ये संरक्षित आहेत.

अधिवास मासेमारीदरम्यान चुकून जाळ्यात अडकणे (बायकॅच) आणि अवैध नष्ट होणे, व्यापार त्यांना यांसारख्या धोक्यांमुळे सर्वोच्च दर्जाचे कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे.

बीएनएचएस च्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या या प्राण्यांना रत्नागिरीतील त्यांच्या क्षेत्रीय केंद्रावर नेण्यात आले. तिथे त्यांना पूर्ण बरे होईपर्यंत एका विशेष पुनर्वसन केंद्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. "हे प्राणी पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांची नियंत्रित परिस्थितीत काळजी घेण्यात आली," असे सागरी शास्त्रज्ञ डॉ. तेजल विजयपुरे यांनी सांगितले.

बीएनएचएस ने सांगितले की, ते २०२४ पासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर समुद्री घोडे संवर्धन प्रकल्प राबवत आहेत. या प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून समुद्री घोड्यांसाठी महत्त्वाचे असलेले सी-ग्रास (सागरी गवत) अधिवास शोधण्यात आले आहेत.

संस्थेने स्थानिक मच्छिमारांचे एक जाळे तयार केले असून, मासेमारी करताना चुकून जाळ्यात अडकलेल्या समुद्री घोड्यांची माहिती देणे आणि त्यांच्या बचावासाठी जागृती कार्यक्रमही राबवले आहेत.

"ही यशस्वी सुटका मच्छिमार समुदाय, शास्त्रज्ञ आणि सरकारी संस्था यांच्यातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करते. या सहकार्यामुळेच समुद्री घोड्यांचे संवर्धन आणि कोकण किनारपट्टीवरील महत्त्वपूर्ण सागरी अधिवासांचे संरक्षण करणे शक्य आहे," असे बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांनी म्हटले आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये