महाराष्ट्र

प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना होणार सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा; महावितरणची योजना

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली आहे. त्यानुसार निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यांत सौरऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आदर्शगाव मान्याचीवाडी या गावाला लवकरच शंभर टक्के सौर उर्जेव्दारे विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे हे गाव लवकरच सौरग्राम म्हणून नावलौकीकाला येणार आहे.

निवड झालेल्या गावात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना ३ किलोवॅटपर्यंत ७८ हजार रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे. तर पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौरऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या गावातील सर्व वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरण आवाहन करणार आहे.

BMCचा मोठा निर्णय : अधिकृत फेरीवाल्यांना मिळणार QR कोड प्रमाणपत्र; बेकायदेशीर विक्रेत्यांना मोठा इशारा

BMC Budget 2026: ९० मिनिटांचा प्रवास आता फक्त २० मिनिटांत; मेगा रोड प्रोजेक्ट्समुळे मुंबईकरांना फायदा

Mumbai : राणीबागेत लवकरच गुजरातच्या सिंहाची गर्जना; सिंहाच्या मागणीसाठी मुंबईच्या महापौरांचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

Mumbai : प्रवाशांना दिलासा! विधानभवन मेट्रो स्थानकाचे B-४ गेट सुरू; B-५ वर निर्बंध कायम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

मातृत्वाला काळिमा! रडणाऱ्या तान्ह्या बाळाच्या तोंडात कोंबला कापडाचा बोळा अन् जिवंत जाळलं