संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

भाजपने जे पेरले तेच उगवले! वैभव नाईक यांचा टोला

कधीकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विचारांचे कार्यकर्ते होते. मात्र भाजपने पैशांचे आमिष दाखवून कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवले आणि पक्ष वाढवला. आता त्याच कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाकडून अधिक आमिषे दाखवली जात आहेत, त्यामुळे जे भाजपने पेरले, तेच आता उगवत आहे, अशी खरमरीत टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

Swapnil S

सिंधुदुर्ग : कधीकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विचारांचे कार्यकर्ते होते. मात्र भाजपने पैशांचे आमिष दाखवून कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवले आणि पक्ष वाढवला. आता त्याच कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाकडून अधिक आमिषे दाखवली जात आहेत, त्यामुळे जे भाजपने पेरले, तेच आता उगवत आहे, अशी खरमरीत टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

सध्या भाजप व शिंदे शिवसेना यांच्यात फोडाफोडीच्या राजकारणावरून रंगलेली जुंप आणि कार्यकर्त्यांचे सुरू असलेले पक्षांतर यावर प्रतिक्रिया देताना नाईक बोलत होते. भाजपचे खरे नेतृत्व प्रभाकर सावंत किंवा रवींद्र चव्हाण करत नाहीत, तर ते राणे कुटुंबच करत आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे, असा स्पष्ट टोला त्यांनी लगावला. सत्ता बदलली की राणे कुठे जातील, तिथे त्यांचे कार्यकर्ते जातील.

भाजपमध्ये शेवटी मोजके कार्यकर्तेच उरतील, असा दावा त्यांनी केला. अजूनही वेळ गेलेली नाही, असे सांगत नाईक यांनी भाजपला मतदारांचे प्रश्न सोडवा, जनतेची कामे करा आणि विचाराधारित कार्यकर्ते घडवा, असा सल्लाही दिला.

Mumbai : भांडुपमध्ये बांधकामस्थळी दुर्घटना; खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, ९ जण जखमी, VIDEO व्हायरल

Mumbai : स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याची गरज; मोटार अपघात दाव्यांसाठी उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना

५३व्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे चाहत्यांसोबत खास सेलिब्रेशन; पाहा VIDEO

बेकायदा बेड्या ठोकल्याबद्दल प्रत्येकी ५० हजारांची भरपाई; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

Mumbai : नायरच्या MBBS विद्यार्थ्याला सावकारी दंड; साडेतीन लाखांचे वसतिगृह शुल्क भरले नाही, तर १९ लाखांचा दंड