महाराष्ट्र

राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा; निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक

आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या कणकवली दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.

Swapnil S

रत्नागिरी : भाजप नेते निलेश राणे गुहागर येथील तळीमध्ये होणाऱ्या सभेसाठी जात असताना चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी झालेल्या राड्यादरम्यान आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरच निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. दगडफेकीच्या घटनेनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या कणकवली दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांनी त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याच मतदारसंघात शुक्रवारी शृंगारतळी येथे जाहीर सभा आयोजित केली होती. शुक्रवारी दुपारी नीलेश राणे गुहागरकडे जाण्यासाठी कूच करत असताना ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास राणे यांच्या गाडीसह सर्व ताफा आमदार जाधव यांच्या चिपळुणातील कार्यालयासमोरून जात असताना अचानक त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांनाही काहीतरी आलबेल घडणार असल्याची शंका असल्याने त्यांनीही मोठा फौजफाटा तैनात केला होता. मोठा जमाव जमताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीत तसेच धावपळीत सात ते आठ कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एकमेकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा आणि घरांच्या खिडक्या फुटल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक