ANI
महाराष्ट्र

आम्ही शिवसेनेच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांची हार, पुष्पगुच्छ घेऊन वाट बघत होतो, मात्र...

पावसाळ्यात मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले, परंतु तेवढ्याच जलदगतीने निचरा झाला हे शिवसेनेचे यश आहे, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले

प्रतिनिधी

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी ते महापालिकेमधील शिवसेना कार्यालयात येतील असे वाटले होते, मात्र ते आलेच नाहीत. आम्ही शिवसैनिक आहोत, असे मुख्यमंत्री सतत बोलत आहेत. आम्ही शिवसेनेच्या कार्यालयात त्यांची हार, पुष्पगुच्छ घेऊन वाट बघत होतो. मात्र ते भाजपच्या कार्यालयात गेले, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत पाणी जमा होते, मात्र यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले, परंतु तेवढ्याच जलदगतीने निचरा झाला हे शिवसेनेचे यश आहे, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास त्यांनी भेट दिली, त्यानंतर त्या बोलत होत्या.

मुंबईत सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट देऊन आढावा घेतला.

Navi Mumbai Airport : पहिल्या दिवशी ३० विमानांची ये-जा; आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक कधीपासून? CIDCO उपाध्यक्षांनी दिली माहिती

भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार; अंतराळवीरांना २०४० पर्यंत चंद्रावर उतरवणार

BMC Elections: महापौरपदासाठी लॉटरी? आरक्षणाची माळ कोणत्या प्रवर्गाच्या गळ्यात पडणार? प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण होणार

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम; महिला प्रवाशांसाठी खास सोय, राईडआधी टिप मागितली तर...

प्रतीक्षा संपली! Navi Mumbai Airport वरून अखेर विमानसेवा सुरू; पहिल्या विमानाला दिली खास सलामी; प्रवाशांना गिफ्टही - Video