प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

MSBSHSE 12th Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती

HSC Result Date and Time: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या २१ मे रोजी जाहीर केला जाणार आहे.

Tejashree Gaikwad

Maharashtra Board 12th Result Date and Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) २१ मे रोजी दुपारी १ वाजता बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करेल. वेगवगेळ्या तारखांच्या अफवानंतर अखेरीस खरी तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी, महाराष्ट्र मंडळातर्फे २ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत इयत्ता १२वीच्या बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षेत सहभागी झालेले विद्यार्थी निकाल लागण्याची वाट पाहत आहेत. अखेरीस २१ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

कसा बघता येईल निकाल?

महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल २०२४ पाहण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्या.

वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला निकाल बघण्यासाठीची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला रोल नंबर आणि आईचे नाव टाका.

निकाल पहा असं लिहलेल्या बटणावर क्लिक करा.

यानंतर, तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. या मार्कशीटची प्रत तुम्ही तिथून डाउनलोड करू शकाल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या डेटानुसार, यावर्षी राज्यात एकूण १५,१३,९०९ उमेदवारांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात ८,२१,४५० मुले आणि ६,९२,४२४ मुलींचा समावेश आहे. ७,६०,०४६ विज्ञान शाखेत बारावीच्या परीक्षेसाठी सर्वाधिक उमेदवारांची नोंदणी झाली होती, त्यापाठोपाठ कला शाखेतील ३,८१,९८२ विद्यार्थी आणि वाणिज्य शाखेतील ३,२९,९०५ उमेदवार आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्र बारावीच्या परीक्षेत, कोकण जिल्ह्यात सर्वाधिक उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के होते.

Mumbai : वीकेंडला ट्रेनने प्रवास करताय? आधीच जाणून घ्या वेळापत्रक; उद्या 'या' मार्गावर २१ तासांचा मेगाब्लॉक

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; फ्लाइट्स कधी आणि कोणत्या मार्गांवर सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर

IPLची रणधुमाळी सुरू! बंगळुरू-हैदराबाद लढतीने आजपासून १९व्या पर्वाला शानदार प्रारंभ

नवी मुंबईतून आता थेट श्रीनगर, गोवा, तिरुपती; उद्यापासून विमानसेवांचा विस्तार, तब्बल ४६ शहरांसाठी थेट सेवा

केंद्र सरकार ८.२० लाख कोटी कर्ज घेणार; महसुली तूट भरून काढण्यासाठी निर्णय