महाराष्ट्र

SSC Result: बारावीचा निकाल लागला, दहावीचा कधी? शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

इयत्ता बारावीचा निकाल लागला आहे. निवडणुकांचे दिवस असतानाही एक आठवडा आधी बारावीचा निकाल लागला आहे. इयत्ता दहावीचा निकाल कधी लागणार याबद्दल शिक्षण मंत्र्यांनी माहिती दिली आहे.

Swapnil S

मुंबई : इयत्ता बारावीचा निकाल लागला आहे. निवडणुकांचे दिवस असतानाही एक आठवडा आधी बारावीचा निकाल लागला आहे. इयत्ता दहावीचा निकालही एक आठवडा आधीच म्हणजे २७ मे रोजी अपेक्षित असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

येत्या २४ तारखेपासून दहावीच्या प्रवेशाची ऑनलाईन माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. बारावीत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. जुलै महिन्यात फेरपरीक्षा होणार असून त्याचे निकाल ऑगस्ट महिन्यात लागणार असल्याने त्यांनाही कॉलेज प्रवेश घेण्याची संधी मिळेल, असे केसरकर म्हणाले.

शाळांची वेळ बदलण्याच्या निर्णयाबाबत पुन्हा बैठक

लहान मुलांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी पहाटेची शाळेची वेळ बदलून सकाळी ९ करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तर होणार आहे, मात्र राज्याच्या काही भागांत विशेषत: शहरी भागात वाहतुकीच्या समस्या येत आहेत. याचा विचार करण्यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन