मुंबई

सुमारे २४ लाखांचे १०७ मोबाईल मूळ मालकांना परत

एका कार्यक्रमांत ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : गेल्या आठ महिन्यांत चोरीसह गहाळ झालेले सुमारे २४ लाख रुपयांचे १०७ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले असून, एमआयडीसी पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे. १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२३ कालावधीत अंधेरी परिसरातील विविध ठिकाणाहून अनेकांचे मोबाईल चोरीसह गहाळ झाले होते. याबाबत संबंधित तक्रारदरांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता.

गेल्या काही दिवसांत पोलीस उपनिरीक्षक कृष्णा खोत व त्यांच्या पथकाने मुंबईसह नवी मुंबई, गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश, कोलकाता येथून चोरीसह गहाळ झालेले सुमारे २४ लाख रुपयांचे १०७ मोबाईल हस्तगत केले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमांत ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री