मुंबई

विसर्जनावेळी राज्यात १४ जणांचा मृत्यू

वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू

नवशक्ती Web Desk

मुंबई : अनंत चतुर्दशीला राज्यात गणेश विसर्जनावेळी बुडून किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यात गणेशोत्सवाची सांगता झाली. विसर्जनासाठी नदी, तलाव, समुद्रकिनारी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यावेळी नाशिकच्या पंचवटीमध्ये तीन, तर नाशिक रोड भागात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. रायगडमधील कर्जत येथे दोघांचा मृत्यू झाला आहे, तर सातारा जिल्ह्यातील उंब्रज, नांदेडमधील वजिराबाद येथे प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे, असेही ते म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यात मूर्ती विसर्जन मिरवणुकीत वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. १७ वर्षीय मुलगी आणि टेम्पो चालकाचा या अपघातात मृत्यू झाला. मुंबईतील जुहू बीचवर गुरुवारी विसर्जनावेळी एका १६ वर्षीय मुलाला समुद्रकिनाऱ्यावरून वाचवण्यात आले, परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान