मुंबई

विसर्जनावेळी राज्यात १४ जणांचा मृत्यू

वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू

नवशक्ती Web Desk

मुंबई : अनंत चतुर्दशीला राज्यात गणेश विसर्जनावेळी बुडून किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यात गणेशोत्सवाची सांगता झाली. विसर्जनासाठी नदी, तलाव, समुद्रकिनारी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यावेळी नाशिकच्या पंचवटीमध्ये तीन, तर नाशिक रोड भागात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. रायगडमधील कर्जत येथे दोघांचा मृत्यू झाला आहे, तर सातारा जिल्ह्यातील उंब्रज, नांदेडमधील वजिराबाद येथे प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे, असेही ते म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यात मूर्ती विसर्जन मिरवणुकीत वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. १७ वर्षीय मुलगी आणि टेम्पो चालकाचा या अपघातात मृत्यू झाला. मुंबईतील जुहू बीचवर गुरुवारी विसर्जनावेळी एका १६ वर्षीय मुलाला समुद्रकिनाऱ्यावरून वाचवण्यात आले, परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Mumbai : 'मेलोडी रोड'वर निर्बंध; रहिवाशांच्या तक्रारीनंतर BMCचा निर्णय, आठवड्यातील ३ दिवस 'जय हो' बंद

दोन महिन्यांचीच इंधनशिदोरी! केंद्र सरकारचे अखेर इंधन स्थितीबाबत स्पष्टीकरण

बेस्ट बसेसना टोलमाफी द्या! बेस्ट समिती अध्यक्षांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र; पाच वर्षांत ७० कोटींचा टोल भरला

पुण्यात रंगणार 'राडा २०२६'; महाराष्ट्राचा पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल, तरुणांसाठी मोठं व्यासपीठ

कर्करोग रुग्णांसाठी अद्ययावत स्वतंत्र इमारत; १२ ऑपरेशन थिएटर, ३ हजारपेक्षा अधिक बेड्स, फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन