मुंबई

विसर्जनावेळी राज्यात १४ जणांचा मृत्यू

वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू

नवशक्ती Web Desk

मुंबई : अनंत चतुर्दशीला राज्यात गणेश विसर्जनावेळी बुडून किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यात गणेशोत्सवाची सांगता झाली. विसर्जनासाठी नदी, तलाव, समुद्रकिनारी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यावेळी नाशिकच्या पंचवटीमध्ये तीन, तर नाशिक रोड भागात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. रायगडमधील कर्जत येथे दोघांचा मृत्यू झाला आहे, तर सातारा जिल्ह्यातील उंब्रज, नांदेडमधील वजिराबाद येथे प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे, असेही ते म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यात मूर्ती विसर्जन मिरवणुकीत वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. १७ वर्षीय मुलगी आणि टेम्पो चालकाचा या अपघातात मृत्यू झाला. मुंबईतील जुहू बीचवर गुरुवारी विसर्जनावेळी एका १६ वर्षीय मुलाला समुद्रकिनाऱ्यावरून वाचवण्यात आले, परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली

मुद्रांक शुल्कातील निधी थेट देणार; स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नवीन कार्यपद्धती - बावनकुळे