मुंबई

गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेला आक्षेप; याचिका सुनावणीसाठी दाखल

१९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात सालेमला पोर्तुगालमध्ये नोव्हेंबर २००५ रोजी अटक करण्यात आली. त्याचे पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सालेमला २५ वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकत नाही. त्याच आदेशाचा संदर्भ देत सालेमने त्याची तुरुंगातून सुटका कधी होणार, याची अधिकृत तारीख जाहीर करण्याबाबत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.

Swapnil S

मुंबई : मुंबईवरील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमने २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्याची शिक्षा माफ होऊ शकत नाही, असे प्रथमदर्शनी निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. अबू सालेमने मुदतपूर्व सुटकेसाठी दाखल केलेल्या याचिकेला केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर न्या. अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने हे निरिक्षण नोंदविताना सालेम याची याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली.

१९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात सालेमला पोर्तुगालमध्ये नोव्हेंबर २००५ रोजी अटक करण्यात आली. त्याचे पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सालेमला २५ वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकत नाही. त्याच आदेशाचा संदर्भ देत सालेमने त्याची तुरुंगातून सुटका कधी होणार, याची अधिकृत तारीख जाहीर करण्याबाबत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. ॲड. ऋषी मल्होत्रा आणि ॲ‍ड. फरहाना शाह यांच्या मार्फत याचिका दाखल केली.

न्यायालयाचे म्हणणे...

याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी याचिकेलाच आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २५ वर्षांचा कालावधी हा नोव्हेंबर २०३० मध्ये पूर्ण होतो. सालेमला नोब्हेंबर २००५ मध्ये अटक करण्यात आली होती. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची दखल खंडपीठाने घेत प्रथमदर्शनी, २५ वर्षे तुरुंगवास अद्याप पूर्ण झालेला नाही असे स्पष्ट करत याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली.

केंद्राचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेल निर्यात शुल्कात बदल; १ जूनपासून नवे दर लागू

वसई पश्चिम पट्टयातील वाहतूककोंडी कमी होणार; सोपारा-गास-सनसिटी आणि नारंगी-आगाशी बायपास रस्ते

Mumbai दुधासाठी रडणाऱ्या चिमुरड्याला दारावर आपटले; ४ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी वडील अटकेत

Mumbai : "पूल सुरक्षितच आहे!" बोरिवली स्थानकातील पादचारी पुलाची पश्चिम रेल्वेकडून पुन्हा तपासणी; व्हायरल व्हिडिओतील दावे फेटाळले

Navi Mumbai : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा TTC औद्योगिक क्षेत्राला फटका; वाहतूक, उत्पादन आणि निर्यात खर्चात वाढ, लघुउद्योग आर्थिक दबावाखाली