मुंबई

गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेला आक्षेप; याचिका सुनावणीसाठी दाखल

१९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात सालेमला पोर्तुगालमध्ये नोव्हेंबर २००५ रोजी अटक करण्यात आली. त्याचे पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सालेमला २५ वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकत नाही. त्याच आदेशाचा संदर्भ देत सालेमने त्याची तुरुंगातून सुटका कधी होणार, याची अधिकृत तारीख जाहीर करण्याबाबत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.

Swapnil S

मुंबई : मुंबईवरील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमने २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्याची शिक्षा माफ होऊ शकत नाही, असे प्रथमदर्शनी निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. अबू सालेमने मुदतपूर्व सुटकेसाठी दाखल केलेल्या याचिकेला केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर न्या. अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने हे निरिक्षण नोंदविताना सालेम याची याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली.

१९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात सालेमला पोर्तुगालमध्ये नोव्हेंबर २००५ रोजी अटक करण्यात आली. त्याचे पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सालेमला २५ वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकत नाही. त्याच आदेशाचा संदर्भ देत सालेमने त्याची तुरुंगातून सुटका कधी होणार, याची अधिकृत तारीख जाहीर करण्याबाबत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. ॲड. ऋषी मल्होत्रा आणि ॲ‍ड. फरहाना शाह यांच्या मार्फत याचिका दाखल केली.

न्यायालयाचे म्हणणे...

याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी याचिकेलाच आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २५ वर्षांचा कालावधी हा नोव्हेंबर २०३० मध्ये पूर्ण होतो. सालेमला नोब्हेंबर २००५ मध्ये अटक करण्यात आली होती. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची दखल खंडपीठाने घेत प्रथमदर्शनी, २५ वर्षे तुरुंगवास अद्याप पूर्ण झालेला नाही असे स्पष्ट करत याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली.

Iran-US-Israel युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी 'आवश्यक वस्तू कायदा' लागू, जाणून घ्या अर्थ

मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video

रस्ते अपघातांमुळे ५८ बसचालक बडतर्फ; २०२२ ते २०२४ दरम्यानच्या अपघातांमुळे कारवाई; उपमुख्यमंत्री शिंदेंची विधान परिषदेत माहिती

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; Akasa Air च्या वेळापत्रकात बदल, जेद्दाहसाठी उड्डाणे सुरू तर काही शहरांतील सेवा बंद