मुंबई

फायनलवर ७० हजार कोटींचा सट्टा

नवशक्ती Web Desk

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक फायनलवर ६० ते ७० हजार कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती आहे. एका सट्टेबाजाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सट्टा बाजारात भारताला पसंती होती. भारतावर ४५ ते ५० तर ऑस्ट्रेलियावर ५५ ते ६० पैसे दर मिळाला.

बुकींनी सांगितले की विश्वचषक विजेतेपदाच्या सामन्याच्या दिवशी सुमारे ५०० ते ६०० वेबसाइट आणि ३०० ते ४०० मोबाइल अॅप सक्रिय असतात. यावरून बुकींनी नाणेफेकीपासून ते एकूण धावसंख्या, आवडत्या फलंदाज किंवा गोलंदाजांवरही सट्टा लावण्यात आला होता. नाणेफेक जिंकणाऱ्या कोणत्याही संघावर एक लाख रुपयांची पैज लावली आणि ती जिंकली तर तुम्हाला ९० हजार रुपये मिळतील. तुमच्या नावाचा संघ नाणेफेक हरला तर तुम्हाला एक लाख रुपये द्यावे लागतील. दोन्ही संघातील अव्वल फलंदाजांपैकी कोण शतक झळकावणार, यावरही सट्टा लावला गेला.

भारताच्या विजयावर सर्वाधिक सट्टा लावला गेला. पण, जेव्हा भारताचा डाव २४० धावांवर संपला, तेव्हा सट्टाबाजार ऑस्ट्रेलियाच्या विजयावर सट्टा लावत होता. सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत सट्टा सुरूच असल्याचे बुकीने सांगितले. सट्टेबाजांनी सांगितले की, सामन्यांसाठी बहुतांश ऑनलाइन बेटिंग घेतले गेले. पोलिसांच्या भितीने सट्टेबाजांनी शहरापासून दूर जात अज्ञात स्थळावरून सट्टा लावला. विशेष म्हणजे जगभरातून लोकांनी या सामन्यावर सट्टा लावला होता.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त