मुंबई

गोराईकरांचा प्रवास आणखी गारेगार; लवकरच १०० एसी बसेस

पर्यावरण संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने पुढाकार घेतला असून अधिकाधिक इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहेत. स्मार्ट कार्ड, प्रीमियम बस सेवा अशा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार व्हावा, यासाठी एसी बसेसची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे.

Swapnil S

मुंबई : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस सामील होत आहेत. बेस्टकडे २७ बस डेपो असून प्रत्येक डेपोत एसी बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत. गोराई बस आगारात ओलेक्ट्रा कंपनीच्या १०० एसी बसेसचा ताफा दाखल होणार असल्याने बोरिवली, गोराईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने पुढाकार घेतला असून अधिकाधिक इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहेत. स्मार्ट कार्ड, प्रीमियम बस सेवा अशा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार व्हावा, यासाठी एसी बसेसची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ओलेक्ट्रा कंपनीच्या २,१०० एसी बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. सध्या उपलब्ध बसेसपैकी धारावी येथील काळा किल्ला येथे १०० व मुंबई सेंट्रल बस आगारात १०० बसेस प्रवासी सेवेत धावत आहेत.‌ विशेष म्हणजे, आणखी १०० एसी बसेस ताफ्यात टप्याटप्याने दाखल होणार असून या बसेस गोराई बसडेपोतून प्रवासी सेवेत धावणार आहेत.

या बस मार्गांवर धावणार!

१२ मीटर लांबीच्या या बसेस संपूर्ण वातानुकूलित असून या बसमधून प्रवासा आरामदायक होणार आहे. प्रथम या बस ४६१ मार्गावर चारकोप ते मुलुंडदरम्यान धावणार असून त्यानंतर ४६० मर्यादित (मुलुंड) २०२ मर्यादित, (माहीम) २२६ मर्यादित बरवे नगर घाटकोपर व नंतर चारकोप ते कांदिवली व बोरिवली या कमी अंतराच्या मार्गावर धावणार आहेत.

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

"कदाचित भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल"; आधी टॅरिफचा तडाखा, आता ट्रम्प यांना पाकचा पुळका; भारताला थेट डिवचलं

IND vs ENG : आजपासून ओव्हलवर निर्णायक द्वंद्व; कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला पाचव्या सामन्यात विजय अनिवार्य