मुंबई

कौटुंबिक वादातून रॉकेल ओतून महिलेला पेटविले

तिच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Swapnil S

मुंबई : कौटुंबिक वादातून सायराबानो मसीउल्ला खान या ३२ वर्षांच्या महिलेवर रॉकेल ओतून तिला पेटविण्यात आल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. उपचारादरम्यान सायराबानोचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी दीर बरकत खान आणि नणंद अंजुम खान या दोघांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता भांडुप येथील सोनापूर, झकेरिया कंपाऊंड, बिस्मिल्ला चाळीत घडली. याच चाळीत सायराबानो ही तिच्या पतीसह इतर सासरच्या मंडळीसोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरी कौटुंबिक वाद सुरु होता. बुधवारी सकाळी तिचा बरकत आणि अंजुमसोबत वाद झाला होता. याच वादातून या दोघांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. त्यात ती ९० टक्के भाजली होती. तिच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी