मुंबई

आझाद मैदानातील आंदोलनकर्ते रुग्णालयात

आमचा जीव गेला तरी मैदान सोडणार नाही, असा इशारा देत आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत.

नवशक्ती Web Desk

मुंबई : दिवाळीचा आनंद सर्वत्र सुरू असताना, आझाद मैदानात आंदोलनकर्ते मात्र आपल्या मागण्यांवर कायम आहेत. पीएचडीच्या माध्यमातून डॉक्टर पदवी घेणारे संशोधक विद्यार्थी मुंबईतील आझाद मैदानातील धूळ, उन , कचरा, अशुद्ध पाणी, डास आदी कारणांमुळे आजारी पडले आहेत.

महाराष्ट्र सरकारने 'महाज्योती' उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील गोरगरीब जनतेतील पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या योजना जाहीर केल्या आहेत; मात्र या योजना फक्त कागदावरच राहिल्याने राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेले संशोधक विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.

तैय्यबा मुलाणी, वैभव जानकर, अविनाश गुरव, तैय्यबा मुलाणी, रोहित परीट, बापूराव घुंगरगावकर, जेतालाल राठोड, तनुजा पंडित सद्दाम मुजावर हे भावी डॉक्टर आजारी पडले आहेत. खोकला, ताप, सर्दी, श्वसनाचा त्रास, दम लागणे, चक्कर येणे, अशक्तपणा इत्यादी आजारांमुळे संशोधक विद्यार्थी आझाद मैदानावर त्रस्त झाले आहेत. आता आमचा जीव गेला तरी मैदान सोडणार नाही, असा इशारा देत आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत.

BCCI ची नक्वींविरोधात तक्रार! आता ICC च्या भूमिकेकडे लक्ष; नक्वींचा मात्र भारताला चषक देण्यास नकार कायम

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

मान्सूनचा टाटा! सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस; भारतीय हवामान खात्याची माहिती

शेतकऱ्यांना भरीव मदत; दुष्काळाच्या निकषानुसार सर्वतोपरी सहाय्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

विकासकांच्या मागण्यांपुढे लाभार्थी हतबल