संग्रहित छायाचित्र 
मुंबई

Air Indiaच्या ट्रॅव्हल पॉलिसीचा गैरवापर; ४ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दंड

एअर इंडियाने केलेल्या सखोल अंतर्गत तपासात ELT सुविधेच्या वापरात मोठी अनियमितता आढळली. कर्मचाऱ्यांनी नियमांनुसार दिलेल्या सुविधेचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले.

किशोरी घायवट-उबाळे

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या Employee Leisure Travel (ELT) सुविधेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. अंतर्गत चौकशीत सुमारे ४,००० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा चुकीचा वापर केल्याचे आढळल्याने कंपनीने कठोर कारवाई सुरू केली आहे.

अंतर्गत चौकशीत उघडकीस आला गैरप्रकार

एअर इंडियाने केलेल्या सखोल अंतर्गत तपासात ELT सुविधेच्या वापरात मोठी अनियमितता आढळली. कर्मचाऱ्यांनी नियमांनुसार दिलेल्या सुविधेचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले.

खोटे नातेवाईक दाखवून मोफत तिकीट

ELT धोरणानुसार कर्मचाऱ्यांना दरवर्षी स्वतःसाठी तसेच पत्नी, पती किंवा पालकांसारख्या नामनिर्देशित कुटुंबीयांसाठी ठराविक संख्येने मोफत विमान तिकिटे मिळतात. मात्र, तपासात काही कर्मचाऱ्यांनी अनोळखी व्यक्तींना नातेवाईक म्हणून दाखवून मोफत तिकिटे घेतल्याचे समोर आले.

तिकीट विकून आर्थिक फायदा

काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांनी ELT सुविधेतून तिकिटे बुक करून ती इतरांना जास्त दरात विकल्याचेही तपासात उघड झाले. यामुळे काहींनी अनधिकृत आर्थिक फायदा घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पैसे परत करण्याचे आदेश

या प्रकरणात चुकीने घेतलेल्या फायद्याची परतफेड करण्याचे अर्थात पैसे परत करण्याचे आदेश एअर इंडियाने संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे.

२४ हजार कर्मचाऱ्यांची कंपनी

एअर इंडियामध्ये सध्या २४,००० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ही विमान सेवा जानेवारी २०२२ मध्ये टाटा ग्रुप (Tata Group) ने ताब्यात घेतली आहे.

कठोर नियम जारी

या प्रकरणानंतर कंपनीने ELT सुविधेसाठीचे कठोर नियम जारी केले आहेत. आता कर्मचाऱ्यांना नामनिर्देशित व्यक्तींची सविस्तर माहिती आणि नातेसंबंध सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

वर्षाला १४ मोफत प्रवासाची सुविधा

ELT धोरणानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला दरवर्षी १४ मोफत प्रवास किंवा रिटर्न तिकिटे मिळण्याचा अधिकार आहे. यामध्ये 'ओपन-जॉ' तिकिटांचीही सुविधा आहे, म्हणजे जाण्याचे आणि परतीचे शहर वेगवेगळे असू शकतात.

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू