ANI
ANI
मुंबई

Rain Alert : मुंबईकरांना समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचे आवाहन

वृत्तसंस्था

यावर्षी पावसाने चांगलाच हाहाकार मांडला आहे, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात पाणी साचल्याने किंवा पूरजन्य परिस्थिती उत्भवताना दिसत आहे. याव्यतिरिक्त एकीकडे मुंबई आणि उपनगरात संततधार पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे मुंबईच्या समुद्रालाही पूर आला आहे. मुंबईतील समुद्राची पातळी सध्या 4.47 मीटरने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने मुंबईकरांना समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचे आवाहन केले. मुसळधार पाऊस पडल्याने पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची परिस्थिती पाहता मुंबईकरांनीच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले. मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी प्रशासनाने मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास लोकांना मज्जाव केला आहे.

रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी सकाळी 6 ते 10 या वेळेतच लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी असेल, त्यानंतर कोणीही समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यत किमान 10 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

माहीम, दादर, परळ आणि भायखळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत पुढील दोन दिवसांसाठी हवामान खात्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. मुंबईतील पावसाचा आतापर्यंत मुंबई लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. लोकल सेवा सुरळीत सुरू आहे.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर