मुंबई

पितृपक्ष सुरू होताच भाज्या कडाडल्या

पितृपक्षात बहुतांशी लोक मांसाहार करत नाहीत. त्यामुळे भाज्यांची मागणी वाढली आहे

प्रतिनिधी

मुंबई : सध्या पितृपक्ष सुरू आहे. त्यामुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. परिणामी गेल्या आठवड्याभरात भाज्यांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली. या पितृपक्षात बहुतांशी लोक मांसाहार करत नाहीत. त्यामुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. दरवर्षी हे घडत असते, असे एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात पाऊस माघारी गेला आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या पुरवठ्यावर झाला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनपेक्षित पाऊस पडला. त्यामुळे नाशिक, पुणे व अन्य भाज्या उत्पादक क्षेत्रात भाज्यांच्या पिकांचे नुकसान झाले. तसेच गणेशोत्सवामुळे गावागावातून भाज्या येण्याचे प्रमाण सध्या कमी आहे, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.

सध्या पालेभाज्यांचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे कोथिंबीर, पालक, मेथी आदींचे प्रमाण घटले आहे. कोथिंबीरची जुडी ३० रुपयांवर गेली आहे, तर फ्लॉवर, भोपळी मिरची, हिरवा वाटाणा आदींचे दर दुप्पट झाले आहेत.

एपीएमसी कार्यालयाने सांगितले की, भाज्याच्या पुरवठ्यात सध्या २० टक्के घट झाली आहे. मुंबई एपीएमसीत रोज भाज्यांच्या ५०० ते ६०० ट्रक येतात. गेल्या आठवड्यात हेच प्रमाण ४५० ते ५०० वाहनांपर्यंत घसरले आहे. भाज्या अत्यंत नाशवंत असतात. विशेषत: वाहतुकीत भाजीपाला खराब होत असतो.

Nerul–Mumbai Ferry : फक्त ३० मिनिटांत मुंबई! १५ डिसेंबरपासून नेरुळ-भाऊचा धक्का फेरी सुरू होणार; भाडे किती? जाणून घ्या डिटेल्स

Goa Nightclub Fire Update : लुथ्रा बंधू थायलंडच्या फुकेतमधून ताब्यात; भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम रवाना

लाज आणली! महिला डॉक्टरांचा स्पर्श व्हावा यासाठी आजारपणाचं नाटक; कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाला अटक

IND vs SA : सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता! भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मुल्लानपूर येथे रंगणार दुसरा टी-२० सामना

परदेशी वारीसाठी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या; राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने सुनावले