मुंबई

आश्रमशाळेत नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

तलासरी तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गिरगाव शासकीय आश्रमशाळेतील नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पल्लवी शरद खोटरे (१४) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

Swapnil S

पालघर : तलासरी तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गिरगाव शासकीय आश्रमशाळेतील नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पल्लवी शरद खोटरे (१४) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

पल्लवी खोटरे ही विद्यार्थिनी शुक्रवारीच आपल्या घरी सुट्टीवरून शाळेत परतली होती. सकाळी सुमारास तिचे नातेवाईक तिला वसतीगृहात सोडून गेले होते. दुपारी, तब्येत बरी नसल्याचे कारण देत तिच्या वर्गातील दोन विद्यार्थिनींनी तिला वसतीगृहात विश्रांतीसाठी नेले. काही वेळातच तिने वसतीगृहाच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

पल्लवीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, वाढता मानसिक तणाव, कौटुंबिक पार्श्वभूमीतील अडचणी, शैक्षणिक दडपण आणि भावनिक अस्थैर्य यांसारख्या कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची गंभीर बाब अधोरेखित झाली आहे.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...