मुंबई

भाजप सरकार हर घर तिरंगांच्या नावाने राजकारण करत आहेत - भाई जगताप

“स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने काँग्रेसतर्फे ‘आझादी गौरव यात्रा’ काढण्यात आली होती

प्रतिनिधी

तिरंगा हा आपल्या देशाची आन-बान-शान आहे, पण केंद्रातील भाजप सरकार हर घर तिरंगांच्या नावाने इव्हेंट करुन आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्याचे राजकारण करत आहे, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. त्याशिवाय स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेखही न केल्यामुळे भाई जगताप यांनी मोदींवर ताशेरे ओढले.

“स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने काँग्रेसतर्फे ‘आझादी गौरव यात्रा’ काढण्यात आली होती. “लोकांना भ्रमित करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप हे हर घर तिरंगाच्या नावाने राजकारण करत आहे. असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी मुंबईत केले.

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी

‘लालबागचा राजा’ मंडळावर गुन्हे दाखल करा; अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Stoinis-Sarah Engagement Photos: स्पेनच्या समुद्रकिनारी स्टॉयनिसचा साखरपुडा; फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज