संग्रहित छायाचित्र
मुंबई

पर्यावरण, वातावरणीय बदल विभागात ४२ अभियंत्यांच्या जागा रिक्त; गेल्या दीड वर्षांपासून अभियंत्यांची वानवा

मुंबई महापालिकेच्या पर्यावरण, वातावरणीय बदल विभागात गेल्या दीड वर्षांपासून अभियंत्यांची वानवा आहे. या विभागातील विविध खात्यामध्ये सुमारे ४२ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या पर्यावरण, वातावरणीय बदल विभागात गेल्या दीड वर्षांपासून अभियंत्यांची वानवा आहे. या विभागातील विविध खात्यामध्ये सुमारे ४२ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी काय भूमिका घेतात, याकडे पर्यावरण, वातावरणीय बदल विभागातील अभियंत्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई शहरांतील वाढते वायूप्रदूषण, विकासकामे यावर उपाययोजनांसह नियंत्रण व कारवाईसाठी अस्तित्वात असलेल्या मुंबई महापालिकेच्या पर्यावरण, वातावरणीय बदल विभाग मुंबई महापालिकेत ऑक्टोबर-२०२४ मध्ये कार्यान्वित करण्यात आला. मात्र हा विभाग सुरू करण्यापूर्वी संपूर्ण मनुष्यबळ घेण्यात आले नाही. सद्यस्थितीत सदर विभागात उपप्रमुख अभियंता-२, कार्यकारी अभियंता - २, सहाय्यक अभियंता - ५, दुय्यम अभियंता - ३३ अशी एकूण ४२ अभियंता संवर्गातील पदे रिक्त आहेत. ते भरण्याकडे नगर अभियंता विभागाचे दुर्लक्ष असल्याचा खुलासा पर्यावरण, वातावरणीय विभागातील एका अधिकाऱ्याने केला.

पर्यावरण, वातावरणीय बदल विभागाकडून गेल्या जुलै २०२४ पासून मुंबईतील पाव-बेकऱ्या, तंदुर भट्ट्या यांच्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी त्यांना सीएनजी गॅसवर करण्याचे न्यायालयाने पालिकेला आदेश दिलेले आहेत. तसेच सिमेंट काँक्रीट प्लांट, निर्माणधीन इमारतीच्या बांधकामस्थळी विकासकाने धूळ प्रदूषण नियंत्रित मशीन लावणे, अशा विविध कामांसाठी अभियंता वर्गाची कमतरता भासत असल्याने या कामांना ब्रेक लागत आहे.

या संवर्गातील रिक्त पदे -

उपप्रमुख अभियंता - २

कार्यकारी अभियंता - २

सहाय्यक अभियंता - ५

दुय्यम अभियंता - ३३

एकूण - ४२

Iran-US-Israel युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी 'आवश्यक वस्तू कायदा' लागू, जाणून घ्या अर्थ

मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video

रस्ते अपघातांमुळे ५८ बसचालक बडतर्फ; २०२२ ते २०२४ दरम्यानच्या अपघातांमुळे कारवाई; उपमुख्यमंत्री शिंदेंची विधान परिषदेत माहिती

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; Akasa Air च्या वेळापत्रकात बदल, जेद्दाहसाठी उड्डाणे सुरू तर काही शहरांतील सेवा बंद