मुंबई उच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

Mumbai : विमानतळावर नमाज नाही; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

धर्मापेक्षा विमानतळाची सुरक्षा ही महत्त्वाची असून कोणत्याही धार्मिक अथवा अन्य कारणासाठी तडजोड होऊच शकत नाही.

Swapnil S

मुंबई : धर्मापेक्षा विमानतळाची सुरक्षा ही महत्त्वाची असून कोणत्याही धार्मिक अथवा अन्य कारणासाठी तडजोड होऊच शकत नाही. असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने विमानतळ परिसरात रमजाननिमित्त नमाज पठण करण्याची मागणी  फेटाळून लावली.

न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने अखेर सुरक्षेच्या कारणास्तव  याचिका निकाली काढली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील तात्पुरत्या शेडमध्ये रिक्षा-टॅक्सी आणि ओला-उबर कॅब चालकांना नमाज पठण करण्याची परवानगी द्यावी या मागणी करीत टॅक्सी-रिक्षा ओला-उबर मेन्स युनियनने  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालय म्हणते... 

  • रमजान गेल्या महिनात १९ फेब्रुवारीला सुरू झाला. विमानतळ परिसरात नमाजासाठी परवानगी मिळाली नाही, म्हणून नमाज पठण थांबले का?

  • नमाज पठण करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. असे असले तरी नमाज पठणासाठी तुम्हाला विशिष्ट जागेचा हट्ट धरून मागणी करता येणार नाही.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग