Mumbai : "लक्ष द्या जरा साहेब!" ; बोरिवली स्थानकावरील पादचारी पुलाला तडे? व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये चिंता 
मुंबई

Mumbai : "लक्ष द्या जरा साहेब!" ; बोरिवली स्थानकावरील पादचारी पुलाला तडे? व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये चिंता

बोरिवली रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाच्या खालच्या भागात तडे दिसत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत तातडीने तपासणीची मागणी केली आहे.

Mayuri Gawade

पश्चिम रेल्वेवरील वर्दळीच्या बोरिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाबाबत (FOB) चिंता व्यक्त केली जात आहे. पुलाच्या खालच्या भागात तडे दिसत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हा व्हिडिओ 'दहिसरकर' या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पुलाच्या खालच्या भागात तडे आणि काही ठिकाणी नुकसान झाल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी पुलाच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करत तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

बोरिवली रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दररोज लाखो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी त्वरित पाहणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. काहींनी पश्चिम रेल्वे, मुंबई पोलिस, महापालिका तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना टॅग करत तातडीने कारवाईची मागणी केली.

“काही अनर्थ घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केला. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने “लक्ष द्या जरा साहेब,” अशी विनंती केली.

काहींनी “एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा प्रश्न उपस्थित करत पुलाची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली. तसेच सार्वजनिक सुविधांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली.

नियमित तपासणीवरही प्रश्नचिन्ह

पुलासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक संरचनांची नियमित तपासणी होत आहे का, असा सवालही अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Mumbai : वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा अहवाल द्या; राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांचे निर्देश

कोकणचा काजू आता ‘जागतिक ब्रँड’ होणार; ४० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

साताऱ्यातील कण्हेर धरणावरील हेल्पर ते केनियातील कृषी सम्राट; कष्ट आणि जागतिक यशाची भावस्पर्शी प्रेरणागाथा

कल्याण-बदलापूर महामार्ग ‘अर्धवट’च! एकाच महामार्गावर तीन वेळा विकासकामे

मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण