Mumbai : "लक्ष द्या जरा साहेब!" ; बोरिवली स्थानकावरील पादचारी पुलाला तडे? व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये चिंता 
मुंबई

Mumbai : "लक्ष द्या जरा साहेब!" ; बोरिवली स्थानकावरील पादचारी पुलाला तडे? व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये चिंता

बोरिवली रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाच्या खालच्या भागात तडे दिसत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत तातडीने तपासणीची मागणी केली आहे.

Mayuri Gawade

पश्चिम रेल्वेवरील वर्दळीच्या बोरिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाबाबत (FOB) चिंता व्यक्त केली जात आहे. पुलाच्या खालच्या भागात तडे दिसत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हा व्हिडिओ 'दहिसरकर' या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पुलाच्या खालच्या भागात तडे आणि काही ठिकाणी नुकसान झाल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी पुलाच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करत तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

बोरिवली रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दररोज लाखो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी त्वरित पाहणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. काहींनी पश्चिम रेल्वे, मुंबई पोलिस, महापालिका तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना टॅग करत तातडीने कारवाईची मागणी केली.

“काही अनर्थ घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केला. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने “लक्ष द्या जरा साहेब,” अशी विनंती केली.

काहींनी “एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा प्रश्न उपस्थित करत पुलाची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली. तसेच सार्वजनिक सुविधांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली.

नियमित तपासणीवरही प्रश्नचिन्ह

पुलासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक संरचनांची नियमित तपासणी होत आहे का, असा सवालही अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये