मुंबई

कोकणात गेलेल्या गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वे सरसावली; परतीच्या प्रवाशांसाठी १४ विशेष रेल्वे चालवणार

गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना मध्य आणि कोकण रेल्वेने दिलासा दिला आहे. गणेश भक्तांसाठी खेड ते सीएसएमटी, खेड ते पनवेल या दरम्यान १४ अनारक्षित गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना मध्य आणि कोकण रेल्वेने दिलासा दिला आहे. गणेश भक्तांसाठी खेड ते सीएसएमटी, खेड ते पनवेल या दरम्यान १४ अनारक्षित गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक ०१०७० अनारक्षित विशेष खेड येथून १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबे असतील.

गाडी क्रमांक ०१०७१ अनारक्षित विशेष पनवेल येथून १३, १४, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुटेल आणि खेड येथे त्याच दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०७२ अनारक्षित विशेष १३, १४, १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबे असतील.

गाडी क्रमांक ०१०७३ अनारक्षित विशेष पनवेल येथून १३, १४ आणि १५ सप्टेंबर रोजी रात्री ९.१० वाजता सुटेल आणि खेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री १ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०७४ अनारक्षित विशेष १३, १४, १५ सप्टेंबर रोजी खेड येथून सकाळी ६ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबे देण्यात येतील. या सर्व रेल्वेगाड्या अनारक्षित म्हणून चालणार असून अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह रेल्वेगाडी सुटण्यापूर्वी यूटीएस प्रणालीद्वारे आरक्षित केल्या जाणार आहेत.

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

राज्यात दोन दिवस वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाने वर्तविला अंदाज

...आणि आता तेलही! युद्धामुळे भारतातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम

मुंबईची तुंबई होणार; मिठी नदीच्या सफाईसाठी कंत्राटदारच नाही, स्थायी समितीत सदस्य आक्रमक

LPG ची टंचाई कायमच; केंद्र सरकारची कबुली, PNG स्वीकारण्याचाही सल्ला