मुंबई

४५ लाखांच्या तेलाची विक्री करून व्यापाऱ्याची फसवणूक

Swapnil S

मुंबई : गेल्या दोन वर्षांत सुमारे ४५ लाखाच्या तेलाची विक्री करुन व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार वरळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बबलू संजय साहू, सुरेश रामदुलार गुप्तासह इतर आरोपीविरुद्ध वरळी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अल्पेश अरविंद गोग्री यांच्या वरळीतील किराणा मालाच्या दुकानात बबलू नावाचा नोकर तेलविक्रेता सुरेश गुप्ता याला दोन वर्षांपासून मागणीप्रमाणे जास्त माल देत असल्याचे उघडकीस आले. बबलूने सुरेशसह इतरांना सुमारे ४५ लाखांचा माल दिल्याचे उघडकीस आले होते. बबलूने सुरेशसह इतर व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून ही फसवणूक केली होती. त्यामुळे त्यांनी वरळी पोलिसांना हा प्रकार सांगून संबंधितांविरुद्ध तक्रार केली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस