मुंबई

न्यायाधीश ही समाजाची सेवा करण्याची संधी; सरन्यायाधीशांचे प्रतिपादन

न्यायाधीश बनणे ही दहा ते पाच नोकरी नाही. ही समाजाची व देशाची सेवा करण्याची संधी आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश बी.आर.गवई यांनी शनिवारी केले.

Swapnil S

मुंबई : न्यायाधीश बनणे ही दहा ते पाच नोकरी नाही. ही समाजाची व देशाची सेवा करण्याची संधी आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश बी.आर.गवई यांनी शनिवारी केले.

बॉम्बे हायकोर्टात आयोजित केलेल्या समारंभात ते म्हणाले की, न्यायपालिकेचे पावित्र्य कायम राहील, याचे भान न्यायाधीशांनी ठेवले पाहिजे. कारण वकील-न्यायाधीशांच्या निष्ठा व समर्पणातून न्यायपालिकेची प्रतिष्ठा वाढली आहे. आपला विवेक, पदाची शपथ व कायद्यानुरूप काम करावे, अशी अपेक्षा न्यायाधीशांकडून ठेवली जाते. खटल्याचा निकाल लागल्यावर त्याने विचलीत होता कामा नये. न्यायाधीशांनी आपल्या शपथेबाबत प्रामाणिक राहिले पाहिजे, असे गवई म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कायदा किंवा राज्यघटनेची व्याख्या व्यावहारिक असावी. ती समाजाची गरज व विद्यमान पिढीच्या अडचणी समजुन घेणारी असावी, असे त्यांनी सांगितले.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; मिरवणुकीला जल्लोषात प्रारंभ

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

मला विचारून 'जीआर' काढल्याचा गैरसमज पसरवू नका! मंत्री भुजबळांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा

अंजना कृष्णा धमकी प्रकरण : अजितदादांची सारवासारव; अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता!