मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच ‘वर्षा’ निवासस्थानी जाणार

बंगल्याची नव्याने रंगरंगोटी करण्यात आली असून वर्षाच्या मुख्य प्रवेशद्वारावरत्यांच्या नावाची पाटीही लावण्यात आली आहे.

प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्‍यांचा मुक्‍काम लवकरच ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हलवणार आहेत; मात्र आपला मुक्काम वर्षावर हलविताना शिंदे आपल्‍या आधीच्या नंदनवन या बंगल्‍याचा ताबा कायम ठेवणार आहेत. एकनाथ शिंदे वर्षावर राहायला येणार असल्याने बंगल्याची नव्याने रंगरंगोटी करण्यात आली असून वर्षाच्या मुख्य प्रवेशद्वारावरत्यांच्या नावाची पाटीही लावण्यात आली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्‍थान हे मलबार हिलवरील वर्षा बंगला आहे. वर्षा बंगला हे राज्‍यातील सत्तेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे सत्ताकारणात वर्षाचे स्थान अनन्यसाधारण आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडले. तेव्हापासून वर्षा निवासस्थान रिक्त आहे. एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; मात्र त्यानंतरही नंदनवनवरून त्यांनी आपला मुक्काम हलविला नाही. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यभरातील नेते, खासदार, आमदार, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे हा बंगला अपुरा पडू लागला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नंदनवन हा पोलिसांसाठी गैरसोयीचा आहे. मुख्यमंत्र्यांचा राजशिष्टाचार लक्षात घेऊन शिंदे यांनी वर्षावर मुक्कामाला यावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे लवकरच वर्षावर जातील. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे नंदनवन आणि अग्रदूत असे दोन बंगले आहेत. २०१४ मध्ये शिंदे यांचा पहिल्यांदा फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून समावेश झाला होता. तेव्हा त्यांना नंदनवन बंगला मिळाला होता. तेव्हापासून शिंदे यांच्याकडे नंदनवन बंगला कायम आहे.

मुंढवा जमीन घोटाळा : पार्थ पवारांना 'क्लीन चिट', दिग्विजय पाटील दोषी; चौकशी समितीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर होणार

Mumbai : भांडुपमधील लग्नाच्या रिसेप्शनमध्ये थरार! लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरून थेट बेसमेंटमध्ये कोसळली; एकच गोंधळ, अनेकजण जखमी

हनीमून मर्डर 2.0 ! पत्नीनेच काढला पतीचा काटा; प्रियकरासह रचला होता कट, पोलिसांच्या तपासात झाला धक्कादायक खुलासा

"मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल, पण आधी.."; एक्स्प्रेस-वे कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले - "सरकारने टोल परत करावा"

सिक्रेट अकाउंट, कोरियन आकर्षण अन् 'ती' डायरी...; तीन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर