मुंबई लोकल संग्रहित छायाचित्र
मुंबई

लोकल अपघातातील दोघांच्या मृत्यूप्रकरणी १६ लाखांची भरपाई

मुंबई : मुंबई लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयात न्याय मिळाला. लोकल अपघातात प्राण गेल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने दोघांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास नकार दिला होता. न्यायालयाने दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ८ लाखांची भरपाई मंजूर केली आणि रेल्वेला ती भरपाई देण्याचा आदेशही दिला.

Kkhushi Niramish

मुंबई : मुंबई लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयात न्याय मिळाला. लोकल अपघातात प्राण गेल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने दोघांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास नकार दिला होता. न्यायालयाने दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ८ लाखांची भरपाई मंजूर केली आणि रेल्वेला ती भरपाई देण्याचा आदेशही दिला.

विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आई-वडिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ९ एप्रिल २०१२ रोजी झालेल्या अपघातात याचिकाकर्त्या रवींद्र पवार यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. रेल्वे अपघात दावे न्यायाधिकरणाने मृत तरुण आणि त्याच्या पालकांच्या वयामध्ये विसंगती असल्याचे निरीक्षण नोंदवत भरपाई नाकारली होती. उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशातर्फे गीता पूर्णा यांनी रेल्वे अपघात दावे न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Karjat : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी; मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कलाकार मग्न

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी