मुंबई

मिठी नदीच्या रुंदीकरणात १९ घरांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात येणार

दीचे रुंदीकरण करण्यात येणार असून, माहीम कॉजवे कोळीवाडा, जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरून होणार आहे

प्रतिनिधी

मिठी नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. यात मिठी नदीचे रुंदीकरण करण्यात येणार आहे; मात्र मिठी नदीच्या रुंदीकरणात माहीम येथील १९ घरांचे काही बांधकाम जमीनदोस्त करण्यात येणार आहे. यामुळे घराचा एरिया कमी होणार असून, पालिका अन्य पर्यायी जागा उपलब्ध करून देत नाही, असा दावा येथील रहिवाशांनी केला आहे.

२६ जुलै, २००५मध्ये मिठी नदीचे अस्तित्व समोर आले आहे. आता नदीचे रुंदीकरण करण्यात येणार असून, माहीम कॉजवे कोळीवाडा, जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरून होणार आहे; मात्र या रुंदीकरणात कोळीवाड्यातील १९ बांधकामे असून, त्या घरांचे काही बांधकाम पाडण्यात येणार आहे. बाधित होणारे बांधकाम सात दिवसांच्या आत स्वतः पाडा; अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता पाडण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने दिला आहे. तसेच या कारवाईत कुठलीही हानी झाल्यास त्यास पालिका जबाबदार नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

'राजमाता जिजाऊ' बस सेवेचा शुभारंभ; ३,००० नव्या गाड्यांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीला चालना

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना; २८ मार्चला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद, पाणी साठवण्याचे BMCचे आवाहन

रॅपर बादशाह दुसऱ्यांदा विवाहबंधनात; अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर Photo व्हायरल

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल