‘समृद्धी’वर वसुली? प्रवाशांमध्ये संताप (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

‘समृद्धी’वर वसुली? प्रवाशांमध्ये संताप

‘समृद्धी महामार्ग’ आता काही आरटीओ अधिकाऱ्यांच्या कथित वसुलीमुळे चर्चेत आला आहे.

Swapnil S

वसई : ‘समृद्धी महामार्ग’ आता काही आरटीओ अधिकाऱ्यांच्या कथित वसुलीमुळे चर्चेत आला आहे. सिन्नर टोलनाका, एसएमबीटी हॉस्पिटलजवळील टोलनाका तसेच इगतपुरी टोलनाका येथे दररोज आरटीओ अधिकारी वाहनांची तपासणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात प्रवाशांना अडवून त्रास देत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते एलायस जोसेफ डिसिल्व्हा यांनी केला आहे.

समृद्धी महामार्गावर वाहन फास्टॅग, सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल मॉनिटरिंगद्वारे तपासले जाते. तरीही टोलनाक्यांच्या बाहेर खासगी कार, टेम्पो आणि ट्रक थांबवून “लायसन्स, पीयूसी, इन्शुरन्स, आरसी” तपासणीच्या नावाखाली रक्कम उकळली. यामुळे बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या पर्यटक आणि व्यावसायिकांमध्ये महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा तयार होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

दोन हजारांत तोडपाणी

कागदपत्रे पूर्ण असूनही वाहनधारकांना ‘केस करतो’, ‘गाडी जप्त करतो’ अशा धमक्या दिल्या जातात. त्यानंतर ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत रोख व्यवहार करून वाहन सोडले जाते. अनेक वेळा अधिकृत पावतीदेखील दिली जात नाही, असा दावा डिसिल्व्हा यांनी केला आहे.

मध्य रेल्वेही करणार अतिक्रमणविरोधात कारवाई; ५ लाख चौरस मीटर जागेवर अतिक्रमण, १६ हजारांहून अधिक अनधिकृत घरे

Navi Mumbai : भाज्यांची दरवाढ; उन्हाचा तडाखा, इंधन दरवाढीचा फटका

विधान परिषदेची जागा बविआला? एकनाथ शिंदे मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत

मुंबई-पुणे नव्या एक्स्प्रेस वेसाठी हालचाली सुरू; १३० किलोमीटरच्या नव्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वेसाठी निविदा

Mumbai : दिग्दर्शक झोया अख्तरच्या प्रोडक्शन हाऊसमधून ६६ हार्ड डिस्क चोरीला; दोन जण गजाआड