मुंबई

पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर आता एक्स्प्रेसमध्ये

प्रतिनिधी

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या काही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. पॅसेंजर गाड्या बंद करून त्यांच्या जागी कमी अंतरासाठी मेमू गाडीच्या फेऱ्या आणि लांब पल्ल्यासाठी चालवल्या जाणाऱ्या पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. दरम्यान, पर्यायी व्यवस्था न करता या पॅसेंजर गाड्या बंद केल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासूनची पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर मध्य रेल्वेकडून बंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर बंद करून ही गाडी इगतपुरी-भुसावळ दरम्यान मेमू गाडीद्वारे चालवली जात आहे. त्यामुळे लोणावळा ते पुणे दरम्यानच्या लहान स्थानकांवर थेट प्रवास करणे अशक्य झाले आहे. परिणामी, प्रवाशांना कर्जत व लोणावळा अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कर्जत-लोणावळा दरम्यान लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेसने प्रवास करून ये-जा करावी लागत आहे. दरम्यान, त्यातही रेल्वेने अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे कसारा व इगतपुरी थांबा गेल्या काही वर्षांत रद्द केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर