मुंबई

पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर आता एक्स्प्रेसमध्ये

पर्यायी व्यवस्था न करता या पॅसेंजर गाड्या बंद केल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे

प्रतिनिधी

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या काही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. पॅसेंजर गाड्या बंद करून त्यांच्या जागी कमी अंतरासाठी मेमू गाडीच्या फेऱ्या आणि लांब पल्ल्यासाठी चालवल्या जाणाऱ्या पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. दरम्यान, पर्यायी व्यवस्था न करता या पॅसेंजर गाड्या बंद केल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासूनची पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर मध्य रेल्वेकडून बंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर बंद करून ही गाडी इगतपुरी-भुसावळ दरम्यान मेमू गाडीद्वारे चालवली जात आहे. त्यामुळे लोणावळा ते पुणे दरम्यानच्या लहान स्थानकांवर थेट प्रवास करणे अशक्य झाले आहे. परिणामी, प्रवाशांना कर्जत व लोणावळा अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कर्जत-लोणावळा दरम्यान लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेसने प्रवास करून ये-जा करावी लागत आहे. दरम्यान, त्यातही रेल्वेने अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे कसारा व इगतपुरी थांबा गेल्या काही वर्षांत रद्द केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

जंजिरा किल्ला सप्टेंबर अखेरपर्यंत खुला? पुरातत्त्व खात्याच्या हालचाली सुरू; असंख्य पर्यटकांची प्रतीक्षा लवकरच संपणार

स्वच्छतेसाठी आंदोलक सरसावले; आझाद मैदान परिसरात पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पुढाकार