मुंबई

रस्ते दुरुस्ती कामांत वेळकाढूपणा भोवला ; तीन कंत्राटदारांना १६ कोटींचा दंड

महापालिकेने मुंबई खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने कामांना सुरुवात केली आहे

नवशक्ती Web Desk

रस्ते दुरूस्तीची कामे नियोजित वेळेत सुरू न करण्यात आल्याने मुंबई महापालिकेने तीन कंत्राटदारांना देण्यात येणारी आगाऊ ६०० कोटींची रक्कम रोखून धरली आहे. तसेच कामाला विलंब झाल्याने तीन कंत्राटदारांना १६ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. दरम्यान, कंत्राटदारांने वेळेत कामे सुरू न केल्याने एप्रिलपासून सुरू होणारी रस्त्यांची कामे मात्र ठप्प पडली आहेत.

महापालिकेने मुंबई खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने कामांना सुरुवात केली आहे. येत्या दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ४०० किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे, त्यासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांसाठी कंत्राटदारांना कामाचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. ही कामे सुरू करण्यासाठी पालिकेने निश्चित कालावधी ठरवला होता. मात्र कंत्राटदाराने ठरलेल्या कालावधीत कामांना सुरुवात केली नाही. निविदा अटींनुसार कामांचे आदेश दिल्यानंतर कंत्राटदारांना एकूण कंत्राटाच्या १० टक्के म्हणजे ६०० कोटी रुपये आगाऊ रक्कम मिळणार होती. त्यानुसार दोन हप्त्यात प्रत्येकी ३०० कोटी रुपये वितरित केले जाणार होते.

राजकारणातला खोटा सिक्का

आजचे राशिभविष्य, २३ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू