मुंबई

मुंबई कस्टम विभागाकडून दीड हजार कोटींच्या अंमली पदार्थाची विल्हेवाट

मुंबई कस्टम विभागाने तसेच डीआरआयने गत वर्षभरामध्ये मुंबईसह नवी मुंबईत वेगवेगळ्या कारवाया करून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पकडले

नवशक्ती Web Desk

अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांवर वेगवगळ्या कारवाया करून मुंबईच्या कस्टम विभागाने गेल्या वर्षभरामध्ये पकडलेला तब्बल ३५० किलो वेगवेगळ्या अंमली पदार्थाची कस्टम विभागाने शुक्रवारी तळोजा येथील कंपनीमध्ये शास्रोक्त पद्धतीने नष्ट करून त्याची विल्हेवाट लावली. नष्ट करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल दीड हजार कोटी इतकी आहे.

मुंबई कस्टम विभागाने तसेच डीआरआयने गत वर्षभरामध्ये मुंबईसह नवी मुंबईत वेगवेगळ्या कारवाया करून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पकडले आहे. यात १९८ किलो मेटाफेटामाईन, ९ किलो कोकेन, १६.६ किलो हेराईन, ३२ किलो गांजा त्याचप्रमाणे रेव्ह पार्टीसाठी वापरण्यात येत असलेले मेट्रक्सचे ८१ टॅबलेट आणि एमडीएचे २९८ टॅबलेट अशा एकुण ३५० किलो वजनाचे अंमली पदार्थांचा समावेश होता.

हा अंमली पदार्थाचा साठा कस्टम विभागाने तळोजा येथील कंपनीत नेऊन तज्ञांच्या मदतीने शास्त्रोक्त पध्दतीने ते नष्ट केले. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे संपुर्ण व्हिडीयो शूटींग देखील करण्यात आले आहे. कस्टम विभागाकडुन नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल दीड हजार कोट रुपये किंमत असल्याची माहिती मुंबई कस्टम विभाग झोन-३चे सहाय्यक आयुक्त श्रीधर धुमाळ यांनी दिली.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

Filmfare Awards Marathi 2025 : पहिलाच चित्रपट आणि थेट 'फिल्मफेअर'! अभिनेता धैर्य घोलपला ‘एक नंबर’ चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू पुरस्कार

Filmfare Awards Marathi 2025 : क्षितीश दाते ठरला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर; 'या' भूमिकेसाठी मिळाला पहिला फिल्मफेअर!

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार