Mumbai : ११३ वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज होणार इतिहासजमा; आज मध्यरात्री अंतिम पाडकाम, लवकरच उभारणार डबल डेकर फ्लायओव्हर 
मुंबई

Mumbai : ११३ वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज होणार इतिहासजमा; आज मध्यरात्री अंतिम पाडकाम, लवकरच उभारणार डबल डेकर फ्लायओव्हर

या ठिकाणी आता डबल डेकर पूल उभारला जाणार असून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) राबवत आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईतील ऐतिहासिक ओळख असलेला ११३ वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज आता इतिहासजमा होणार आहे. शुक्रवारी (दि. ३) आणि शनिवारी (दि.४) मध्यरात्री या पुलाच्या अंतिम भागाचे पाडकाम करण्यात येणार असून, शहरातील मोठ्या पायाभूत प्रकल्पासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

नव्या प्रकल्पासाठी मार्ग मोकळा

'मिड डे' च्या वृत्तानुसार, एल्फिन्स्टन ब्रिजचे पाडकाम हे वरळी-शिवडी एलिव्हेटेड कॉरिडॉर (४.५ किमी) प्रकल्पाचा भाग आहे. या ठिकाणी आता डबल डेकर पूल उभारला जाणार असून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) राबवत आहे.

रेल्वे मार्गावरील काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MRIDC) कडून केले जात आहे.

पाडकाम का आवश्यक?

या पुलाची रुंदी आणि उंची वाढवण्याची गरज असल्यामुळे पाडकाम आवश्यक ठरले आहे. तसेच, याच मार्गावरून एलिव्हेटेड कॉरिडॉर जाणार असल्यामुळे नवीन संरचना उभारणे गरजेचे आहे.

महत्त्वाचा कनेक्टर

एल्फिन्स्टन ब्रिज हा प्रभादेवी आणि परळ परिसराला जोडणारा महत्त्वाचा पूर्व-पश्चिम मार्ग होता. नव्या पुलामुळे या भागातील वाहतूक अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेष रेल्वे ब्लॉक जाहीर

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाडकाम सुरळीत पार पाडण्यासाठी परळ ते करी रोड दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा ब्लॉक रात्री १२:३० ते पहाटे ४:३० या वेळेत लागू असेल. या काळात काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे.

कोणत्या गाड्यांवर परिणाम?

  • कोणार्क एक्सप्रेस

  • हावडा-CSMT मेल

  • मंगळुरू-CSMT एक्सप्रेस

या गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान वळवण्यात येतील आणि दादर स्थानकावर दोन वेळा थांबतील.

इतिहासाचा शेवट

हा पूल १९१३ मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने बांधला होता. त्यावेळी मद्रास प्रेसीडेंसीचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून या पुलाला नाव देण्यात आले.

१२ सप्टेंबर २०२५ पासून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आता अंतिम टप्प्यातील पाडकामामुळे ब्रिटिशकालीन या संरचनेचा शेवट होऊन आधुनिक मुंबईच्या नव्या युगाची सुरुवात होणार आहे.

Mumbai : पावसाळ्यात मेट्रो सज्ज; MMRDA ची एआय-आधारित पेन्टाेग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित

लातूरला नांगराच्या औताला पत्नीला जुंपले; आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकऱ्याची हतबलता

Mumbai : पालिकेची बेस्टला ५०० कोटींची मदत; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला बेस्ट दिलासा

MIDC कर्ज उभारणी अधिकारात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Jammu-Kashmir : ‘झोजिला’चा मार्ग मोकळा; गडकरी यांच्या हस्ते अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य