मुंबई

पाणी तुंबल्यास अभियंता जबाबदार; मुंबई महापालिकेचा इशारा

नवशक्ती Web Desk

मुंबई : नालेसफाईचे काम ज्या विभागात योग्य पद्धतीने झाले नाही आणि त्या ठिकाणी पाणी तुंबले, तर अभियंता व दुय्यम अभियंता जबाबदार असतील, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून नालेसफाईच्या कामाचा नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. ज्या विभागात नालेसफाई होऊन पाणी तुंबले तर त्या ठिकाणी कार्यरत अभियंता व दुय्यम अभियंता जबाबदार असतील आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांना केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून जो भाग जलमय होईल त्या ठिकाणचे अभियंता व दुय्यम अभियंता जबाबदार असतील, आसा स्पष्ट इशारा दिला आहे.

मुंबईतील मोठ्या नाल्यांची जबाबदारी अभियंता व लहान नाल्यांसाठी दुय्यम अभियंता जबाबदार असतील, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.आधी-नंतरचे फोटो झळकणार
नालेसफाई झाली नाही, असा आरोप केला जातो. त्यामुळे आता नालेसफाई आधी तेथील कचरा, नालेसफाई करताना व नालेसफाईची कामे पूर्ण झाल्यावर असे फोटो पालिकेच्या वेबसाईट टाकण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण