मुंबई

दरवर्षी भारतीय ८७ लाख टन अन्न फुकट घालवतात; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

प्रतिनिधी

अन्न हे पूर्णब्रह्म’ असे आपली भारतीय संस्कृती मानते; पण भारतीय लोक हे अन्न फुकट घालवण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले. दरवर्षी भारतीय सहा कोटी ८७ लाख १६३ टन अन्न फुकट घालवत असल्याचा खळबळजनक अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत अन्न नासाडी निर्देशांकातून उघड झाला आहे.

कोविडकाळात भारताने कोणीही नागरिक उपाशी राहू नये म्हणून नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप केले होते. गरीब कल्याण योजनेंतर्गत ही योजना राबवली होती; मात्र भारताने अन्नाची नासाडी रोखल्यास देशात कोणीही उपाशी झोपणार नाही.

‘अर्थ ओव्हरशूट दिवसा’च्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी अन्न वाया न घालवण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. यंदा २८ जुलैला हा ‘अर्थ ओव्हरशूट दिवस’ आला आहे. या तारखेचे वैशिष्टय म्हणजे, निसर्गाकडून वर्षभरात मिळणाऱ्या संसाधनाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. वर्षाच्या अन्य दिवशी आपण पृथ्वीवरील संसाधने रिकामी करत असतो. ‘अर्थ ओव्हरशूट’च्या दिवशी नैसर्गिक संसाधनाच्या नुकसानीचे अनुमान लावले जाऊ शकते. निसर्ग वर्षभरात जितके उत्पादन घेण्यास सक्षम आहे. तेवढे उत्पादन आपण वर्ष पूर्ण होण्याच्या आत संपवून टाकतो.

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

काय सांगता! फक्त ६ लाखांत घरी आणा 'या' जबरदस्त कार, फीचर्सही आहेत दमदार

होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश