बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी गणेशोत्सव मंडळ व घराघरात सुरू आहे. मात्र विघ्नहर्त्याला खड्ड्यांचे विघ्न असून बाप्पाच्या विसर्जनापूर्वी खड्डे बुजवा, असे निवेदन पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांना दिल्याचे भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.
दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण होते. खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र मुंबईतील खड्डे आजही सुस्थितीत आहेत. बाप्पाचे आगमन एका दिवसावर आले असून बाप्पाचे आगमन खड्ड्यातून होणार आहे; मात्र बाप्पाचे विसर्जन खड्डेमुक्त रस्त्यातून होणे अपेक्षित आहे. भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांनी मुंबई शहर व दोन्ही उपनगरांतील खड्ड्यांची पाहणी केली; मात्र शहर व दोन्ही उपनगरातील खड्डे बुजवण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बाप्पाचे विसर्जन ९ सप्टेंबर रोजी असून त्यापूर्वी खड्डे बुजवा, अशी मागणी भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.