मुंबई

उड्डाणपुलाचा मच्छिमारांना फटका? मार्वे मनोरीदरम्यान नवीन उड्डाणपूल बांधणार

मालाड मार्वे-मनोरी दरम्यान मुंबई महापालिकेने नवीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मालाड मार्वे-मनोरी दरम्यान मुंबई महापालिकेने नवीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मार्वे येथून मनोरी आणि जवळपासच्या ठिकाणी जाण्यासाठी मीरा रोड, भाईंदर-गोराईपर्यंत पश्चिम द्रूतगती महामार्गाद्वारे जावे लागते. या प्रवासासाठी सुमारे २९ किमीचा वळसा घालावा लागतो. मात्र मार्वे मनोरीदरम्यान उड्डाणपूल झाल्यास वेळ, पैसा व इंधनाची बचत होणार आहे. परंतु पुलामुळे मच्छिमारांवर परिणाम होणार का यासाठी पालिका अभ्यास करणार आहे.

गोराई, मनोरी, उत्तन व परिसरातील काही भाग पालिकेच्या अखत्यारित येतो. या भागांना जोडण्यासाठी येथे पूल बांधणे अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. एमसीझेडएमएच्या नुकत्याच झालेल्या १५७ व्या बैठकीत सीआरझेड परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावर प्राधिकरणाने या पुलामुळे मत्स्यव्यवसाय करण्याऱ्या समुदायांवर होणारे परिणाम तसेच त्यांच्यावरील आर्थिक व सामाजिक बदल याबाबत अभ्यास आवश्यक असून ही बाब पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालामध्ये समविष्ट करण्यास पालिकेला सांगितले आहे.

१४ फेब्रुवारीला बैठक

१४ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई पालिका के-पश्चिम कार्यालय इमारत, दुसरा मजला, पालीराम रस्ता, अंधेरी बेस्ट बस डेपोसमोर, स्वामी विवेकानंद मार्गाजवळ, अंधेरी पश्चिम येथे सायंकाळी ४ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ट्रम्प फॅसिस्ट आहेत का? पत्रकारांचा थेट सवाल; ममदानींना थांबवत डोनाल्ड ट्रम्पच बोलले, “स्पष्टीकरण...

पालघर : शाळेची बॅग ठरली ढाल! पाचवीतल्या २ मित्रांची बिबट्याशी थरारक झुंज

देशात चार नवीन कामगार संहिता लागू; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० कोटी कामगारांना ‘सुरक्षा कवच’

शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरूच; अभिवादनासाठी एकत्र, पण दुरावा कायम

दुबईमध्ये ‘एअर शो’दरम्यान ‘तेजस’ लढाऊ विमान कोसळले; वैमानिकाचा मृत्यू, चौकशीचे आदेश