मुंबई

पावसाळी सहल जीवावर बेतली! मुंबईतील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

पावसाळी सहलीसाठी ३७ तरुण-तरुणी खालापूरच्या सोंदाई फोर्ट येथे ट्रेकिंगसाठी आले होते. दीड वाजण्याच्या सुमारास साई बंधारा पोखरवाडी येथे ते सर्व पोहायला उतरले. तीन वाजण्याच्या सुमारास एक मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी

Swapnil S

कर्जत : मुंबईतील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळी सहलीसाठी खालापूर येथील धरणात ते पोहायला गेले होते.

पावसाळी सहलीसाठी ३७ तरुण-तरुणी खालापूरच्या सोंदाई फोर्ट येथे ट्रेकिंगसाठी आले होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साई बंधारा पोखरवाडी येथे ते सर्व पोहायला उतरले. तीन वाजण्याच्या सुमारास एक मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेली अन्य तीन मुले बुडाली. बचाव पथकाने तीन मुलांचे मृतदेह चौक ग्रामीण रुग्णालय येथे आणले, तर एका तरुणाला बेशुद्धावस्थेत बाहेर काढून रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाला. आकाश माने (२६), रनोद बंदा (२०), एकलव्य सिंग (१७), ईशांत यादव (१३) अशी मृत मुलांची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पुढील तपास करीत आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत