मुंबई

पावसाळी सहल जीवावर बेतली! मुंबईतील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

पावसाळी सहलीसाठी ३७ तरुण-तरुणी खालापूरच्या सोंदाई फोर्ट येथे ट्रेकिंगसाठी आले होते. दीड वाजण्याच्या सुमारास साई बंधारा पोखरवाडी येथे ते सर्व पोहायला उतरले. तीन वाजण्याच्या सुमारास एक मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी

Swapnil S

कर्जत : मुंबईतील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळी सहलीसाठी खालापूर येथील धरणात ते पोहायला गेले होते.

पावसाळी सहलीसाठी ३७ तरुण-तरुणी खालापूरच्या सोंदाई फोर्ट येथे ट्रेकिंगसाठी आले होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साई बंधारा पोखरवाडी येथे ते सर्व पोहायला उतरले. तीन वाजण्याच्या सुमारास एक मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेली अन्य तीन मुले बुडाली. बचाव पथकाने तीन मुलांचे मृतदेह चौक ग्रामीण रुग्णालय येथे आणले, तर एका तरुणाला बेशुद्धावस्थेत बाहेर काढून रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाला. आकाश माने (२६), रनोद बंदा (२०), एकलव्य सिंग (१७), ईशांत यादव (१३) अशी मृत मुलांची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पुढील तपास करीत आहेत.

पेट्रोल-डिझेल भरपूर, तेल कंपन्यांचा खुलासा; तुटवड्याच्या अफवा फेटाळल्या

कुपोषण समस्या सोडवण्यात राज्य सरकार अपयशी; मेळघाट बालमृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे ताशेरे

रस्ते जोडणीत  २९७ कोटींचा अनावश्यक खर्च; कॅगच्या अहवालातून धक्कादायक माहिती

मुंबईच्या पाण्याचा ‘जोर’ आणखी वाढणार; भांडुप संकुलात ९०० MLD क्षमतेचा पंप बसवणार 

पक्ष ताब्यात घेण्याचा पटेल, तटकरेंचा प्रयत्न; आमदार रोहित पवार यांचा घणाघाती आरोप