मुंबई

पावसाळी सहल जीवावर बेतली! मुंबईतील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

पावसाळी सहलीसाठी ३७ तरुण-तरुणी खालापूरच्या सोंदाई फोर्ट येथे ट्रेकिंगसाठी आले होते. दीड वाजण्याच्या सुमारास साई बंधारा पोखरवाडी येथे ते सर्व पोहायला उतरले. तीन वाजण्याच्या सुमारास एक मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी

Swapnil S

कर्जत : मुंबईतील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळी सहलीसाठी खालापूर येथील धरणात ते पोहायला गेले होते.

पावसाळी सहलीसाठी ३७ तरुण-तरुणी खालापूरच्या सोंदाई फोर्ट येथे ट्रेकिंगसाठी आले होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साई बंधारा पोखरवाडी येथे ते सर्व पोहायला उतरले. तीन वाजण्याच्या सुमारास एक मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेली अन्य तीन मुले बुडाली. बचाव पथकाने तीन मुलांचे मृतदेह चौक ग्रामीण रुग्णालय येथे आणले, तर एका तरुणाला बेशुद्धावस्थेत बाहेर काढून रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाला. आकाश माने (२६), रनोद बंदा (२०), एकलव्य सिंग (१७), ईशांत यादव (१३) अशी मृत मुलांची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पुढील तपास करीत आहेत.

Maharashtra Election Results Live : मुंबईत ठाकरे बंधूंना, पुण्यात दोन्ही पवारांना धक्का; २९ पैकी २१ महापालिका 'भाजपमय'!

मराठीविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदाराने ठाकरे बंधूंना डिवचले; BMC निकाल बघून म्हणाले, "मी मुंबईत येऊन उद्धव-राज...

ठाकरे बंधूंना धक्का? BMC सह राज्यातील बहुतांश महापालिका होणार 'भाजपमय'; विविध 'एक्झिट पोल'मधील अंदाज

Thane : अनेक मतदान केंद्रांवर EVM बिघाड; मशीन बंद, सिरीयल क्रम चुकले; मतदारांना मनस्ताप

पुणे - पिंपरीमध्ये मतदानात मोठा गोंधळ!मतदारयादीतील नावे गायब, ईव्हीएम बिघाड, बोगस मतदानाचे आरोप