मुंबई

पावसाळी सहल जीवावर बेतली! मुंबईतील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

पावसाळी सहलीसाठी ३७ तरुण-तरुणी खालापूरच्या सोंदाई फोर्ट येथे ट्रेकिंगसाठी आले होते. दीड वाजण्याच्या सुमारास साई बंधारा पोखरवाडी येथे ते सर्व पोहायला उतरले. तीन वाजण्याच्या सुमारास एक मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी

Swapnil S

कर्जत : मुंबईतील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळी सहलीसाठी खालापूर येथील धरणात ते पोहायला गेले होते.

पावसाळी सहलीसाठी ३७ तरुण-तरुणी खालापूरच्या सोंदाई फोर्ट येथे ट्रेकिंगसाठी आले होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साई बंधारा पोखरवाडी येथे ते सर्व पोहायला उतरले. तीन वाजण्याच्या सुमारास एक मुलगा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेली अन्य तीन मुले बुडाली. बचाव पथकाने तीन मुलांचे मृतदेह चौक ग्रामीण रुग्णालय येथे आणले, तर एका तरुणाला बेशुद्धावस्थेत बाहेर काढून रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाला. आकाश माने (२६), रनोद बंदा (२०), एकलव्य सिंग (१७), ईशांत यादव (१३) अशी मृत मुलांची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पुढील तपास करीत आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत