एक्स @abuasimazmi
मुंबई

पाण्याच्या टाकीत गुदमरून चार कामगारांचा मृत्यू; नागपाडा येथील धक्कादायक घटना, चौकशीनंतर पुढील कारवाई - अश्विनी जोशी

नागपाडा येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीतील बेसमेंटमध्ये असलेली पाण्याची टाकी साफ करण्यासाठी पाच कामगार उतरले असता विषारी वायूमुळे गुदमरून पाचपैकी चार कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.

Swapnil S

मुंबई : नागपाडा येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीतील बेसमेंटमध्ये असलेली पाण्याची टाकी साफ करण्यासाठी पाच कामगार उतरले असता विषारी वायूमुळे गुदमरून पाचपैकी चार कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या दुर्घटनेबाबत प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.

नागपाडा मिंट रोड, गुड लक मोटर ट्रेनिंग स्कूलजवळ ‘बिस्मिल्लाह स्पेस’ या २० मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाण्याची टाकी असून ती साफ करण्यासाठी एक कामगार रविवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास टाकीत उतरला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने अन्य चार कामगार या अडकलेल्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी टाकीत उतरले. मात्र, टाकीतील विषारी वायूमुळे हे चारही कामगार गुदमरून गेले. टाकीत अडकलेल्या या पाचही कामगारांना मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आणि त्यांना जवळील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, पाचपैकी चार कामगारांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या चार कामगारांचा मृत्यू

हासिपल शेख (१९), राजा शेख (२०), जियाउल्ला शेख (३६) व इमांदू शेख (३८) या चार कामगारांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला, तर पुरहान शेख (३१) या जखमी कामगारावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन