मुंबई

गोराईतील पुलाच्या पुनर्निर्माणाला मंजुरी; पाडकामामुळे कोळीवाड्यांमधील संपर्क तुटणार

बोरिवली (पश्चिम) येथील गोराई गावातील वरच्या आणि खालच्या कोळीवाड्यांना जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी किनारपट्टी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) परवानगी मिळाली आहे.

Swapnil S

मुंबई : बोरिवली (पश्चिम) येथील गोराई गावातील वरच्या आणि खालच्या कोळीवाड्यांना जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी किनारपट्टी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) परवानगी मिळाली आहे. मात्र, नाल्यावरील पूल पाडकामामुळे वरच्या आणि खालच्या कोळीवाड्यांचा संपर्क तुटणार आहे. पुलाचे पाडकाम करून पुनर्निमाण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

गोराई गावातील पादचारी पूल निसरडा झाल्याने येथून रस्त्यावरून चालणे प्रवाशांना कठीण झाले होते. फेरीबोट पकडण्यासाठी दुचाकीस्वार, रिक्षाचालक या रस्त्याचा वापर करून गोराई गावात पलीकडे जातात. निसरड्या पादचारी पुलावरून गोराई गावातून मासे विक्री व भाजी विक्री करणाऱ्या महिला, गोराई गाव, मनोरी, कुलवेम, उत्तन या गावांमधील नागरिक, कर्मचारी, शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आदी रोज ये-जा करतात. मात्र पूल निसरडा झाल्याने सर्वांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नाल्यावरील पुलाचे पाडकाम करून पुनर्निमाण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आणि किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझे) मंजुरी दिली आहे.

BMCचा मोठा निर्णय : अधिकृत फेरीवाल्यांना मिळणार QR कोड प्रमाणपत्र; बेकायदेशीर विक्रेत्यांना मोठा इशारा

BMC Budget 2026: ९० मिनिटांचा प्रवास आता फक्त २० मिनिटांत; मेगा रोड प्रोजेक्ट्समुळे मुंबईकरांना फायदा

Mumbai : राणीबागेत लवकरच गुजरातच्या सिंहाची गर्जना; सिंहाच्या मागणीसाठी मुंबईच्या महापौरांचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

Mumbai : प्रवाशांना दिलासा! विधानभवन मेट्रो स्थानकाचे B-४ गेट सुरू; B-५ वर निर्बंध कायम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

मातृत्वाला काळिमा! रडणाऱ्या तान्ह्या बाळाच्या तोंडात कोंबला कापडाचा बोळा अन् जिवंत जाळलं