मुंबई

गोराईतील पुलाच्या पुनर्निर्माणाला मंजुरी; पाडकामामुळे कोळीवाड्यांमधील संपर्क तुटणार

बोरिवली (पश्चिम) येथील गोराई गावातील वरच्या आणि खालच्या कोळीवाड्यांना जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी किनारपट्टी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) परवानगी मिळाली आहे.

Swapnil S

मुंबई : बोरिवली (पश्चिम) येथील गोराई गावातील वरच्या आणि खालच्या कोळीवाड्यांना जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी किनारपट्टी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) परवानगी मिळाली आहे. मात्र, नाल्यावरील पूल पाडकामामुळे वरच्या आणि खालच्या कोळीवाड्यांचा संपर्क तुटणार आहे. पुलाचे पाडकाम करून पुनर्निमाण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

गोराई गावातील पादचारी पूल निसरडा झाल्याने येथून रस्त्यावरून चालणे प्रवाशांना कठीण झाले होते. फेरीबोट पकडण्यासाठी दुचाकीस्वार, रिक्षाचालक या रस्त्याचा वापर करून गोराई गावात पलीकडे जातात. निसरड्या पादचारी पुलावरून गोराई गावातून मासे विक्री व भाजी विक्री करणाऱ्या महिला, गोराई गाव, मनोरी, कुलवेम, उत्तन या गावांमधील नागरिक, कर्मचारी, शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आदी रोज ये-जा करतात. मात्र पूल निसरडा झाल्याने सर्वांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नाल्यावरील पुलाचे पाडकाम करून पुनर्निमाण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आणि किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझे) मंजुरी दिली आहे.

दिवाळीत ‘धमाका’ नव्हे, शिस्त! पुणे पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Mumbai Metro 3 : फक्त Hi करा, तिकीट मिळवा! WhatsApp द्वारे एका क्लिकमध्ये बुक करा तिकीट, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Mumbai Metro 3 : ना नेटवर्क, ना फोन कॉल; UPI पेमेंटमध्येही अडचणी, पहिल्याच दिवशी मुंबईकर त्रस्त

आजपासून Mumbai One ॲप सुरू, पण iPhone वापरकर्त्यांना नाही सापडत! जाणून घ्या डाउनलोडचा पर्याय आणि फीचर्स

IPS पूरन कुमार आत्महत्या प्रकरण : ९ पानी चिठ्ठी, १५ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप; अखेर 'हे' धक्कादायक कारण समोर