मुंबई

मुसळधार पावसामुळे मध्य, पश्चिम रेल्वे विस्कळीत

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाचे पावसामुळे धाबे दणाणले आहेत.

प्रतिनिधी

मागील दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहरात देखील पावसाने जोरदार बॅटिंग करत जनजीवन विस्कळीत केले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलला बसत असून सोमवार ४ जुलै रोजी पावसामुळे मध्य, पश्चिम रेल्वेवरील वाहतूक तब्बल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे. तर अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना स्थानकात खोळंबून राहावे लागत आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाचे पावसामुळे धाबे दणाणले आहेत. मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली असली तरी पावसाच्या माऱ्यापुढे अवघ्या काही दिवसातच विविध कारणांनी रेल्वे सेवा विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे.

बुधवार रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावर बहुतांश ठिकाणी रुळांमध्ये पाणी साचणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड यांसारख्या घटना घडल्या. परिणामी सोमवार ४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास रेल्वे वाहतूक तब्बल २० मिनिटे उशिराने धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. परिणामी सीएसएमटी दिशने येणाऱ्या लोकल विलंबाने धावत होत्या. तर बहुतांश लोकलसेवा अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकात खोळंबून राहावे लागले. तर काही प्रवाशांनी पुन्हा माघारी परतणे पसंत केले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत